पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर भारताने ठोस कारवाई
करत पाकिस्तान व पीओकेमधील (पाकव्याप्त काश्मीर) दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हवाई हल्ले केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक स्ट्राईक करत त्यांचा खात्मा केला.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
या ठोस आणि निर्णायक कारवाईनंतर संपूर्ण देशभरात तसेच राज्यातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक
ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अकोल्यात देखील याचा परिणाम दिसून आला.
अकोल्यातील अग्रेसन चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला.
या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नागरिकांनी “भारत माता की जय”, “पाकिस्तान मुर्दाबाद”,
“जय हिंद, जय सेना” अशा घोषणा देत भारतीय सैन्याच्या धाडसाचे व पराक्रमाचे अभिनंदन केले.
या जल्लोषाद्वारे अकोल्यातील नागरिकांनी दहशतवादाच्या विरोधात
आणि भारतीय सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे निदर्शित केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharitachaya-air-strikentar-chinachi-turkali-pakistanla-restraint/