नवी दिल्ली | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने तिन्ही सैन्यदलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले असून,
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
Continue reading
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
पाकिस्तानकडून अधिक हालचालींची शक्यता वर्तवली जात आहे.
या दरम्यान पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली यांनी धक्कादायक दावा केला आहे.
ते म्हणाले, “पुढील सात दिवसांत भारत पाकिस्तानविरोधात मोठी लष्करी कारवाई करू शकतो.“
हल्ल्यानंतरचा धोका वाढला
22 एप्रिल रोजी बैसरन व्हॅली, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला.
सूत्रांनुसार, हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानमध्ये परतले आहेत. यामुळे भारताची कारवाईची शक्यता आणखी बळावली आहे.
उरी आणि पुलवामाच्या धर्तीवर कारवाई होणार?
अब्दुल बासित यांनी 2016 च्या उरी हल्ल्यानंतर आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक
आणि एअर स्ट्राईक ची आठवण करून दिली. “भारत आता पुन्हा तसंच काही करेल,” असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकत्याच दिलेल्या भाषणात पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
त्यामुळे लष्करी कारवाईचा काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा आहे.
सिंधू जल कराराचाही उल्लेख
बासित यांनी सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) रद्द करण्यासंदर्भातही चिंता व्यक्त केली.
त्यांनी पाकिस्तान सरकारला जागतिक बँकेशी संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे. “भारत आपले आंतरराष्ट्रीय कर्तव्य पाळत नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
Read Also : https://ajinkyabharat.com/torrent/