मुंबई |
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना
(UBT) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या महिला प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
यांनी रविवारी (13 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
या घडामोडीनं मुंबईतील ठाकरे गटातील असंतोष पुन्हा एकदा समोर आला आहे.
‘जय महाराष्ट्र’ म्हणत घेतला निरोप:
संजना घाडी या ठाकरे गटातील आक्रमक आणि सक्रिय नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या.
त्या अनेक वेळा न्यूज चॅनलवरील चर्चांमध्ये ठाकरे गटाची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसल्या होत्या.
काही दिवसांपूर्वीच त्यांना प्रवक्त्या म्हणून नियुक्त केलं गेलं होतं.
मात्र प्रवक्त्यांच्या यादीतील गोंधळामुळे त्या नाराज झाल्या होत्या.
प्रारंभी त्यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने आणि नंतर तातडीने समावेश केल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली होती.
शिंदे गटात दणक्यात प्रवेश:
रविवारी संजना आणि संजय घाडी यांच्यासह अनेक समर्थकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
या प्रवेशामुळे BMC निवडणुकीआधी ठाकरे गटाच्या संघटनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
BMCपूर्वीचा धोका वाढला:
महाविकास आघाडीची ताकद असलेल्या ठाकरे गटात अशा प्रकारचं पक्षांतर होणं ही नक्कीच मोठी राजकीय घडामोड आहे.
खास करून BMC निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर संजना घाडी
यांच्यासारख्या अनुभवी नगरसेविकेचं दुसऱ्या गटात जाणं, हे ठाकरे गटासाठी गंभीर आव्हान ठरू शकतं.