अकोट तहसीलदारांना निवेदन सादर; सरकारच्या आश्वासनाची आठवण करून दिली
अकोट (प्रतिनिधी)
अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)
यांच्यावतीने तालुकाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. पक्षाचे तालुकाध्यक्ष
Related News
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा जगभरात डंका! नेटफ्लिक्सवर नॉन-इंग्रजी चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर; 192 देशांतील प्रेक्षकांची पसंती
Continue reading
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्ट उत्तर; ‘ना त्यांनी संपर्क केला, ना मी’
शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? चर्चांवर एकन...
Continue reading
मोठी बातमी! शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ नाशिकात फसलं? उद्धव ठाकरेंसमोर 15 नगरसेवकांची एकजूट; 5 कोटींच्या ऑफरचाही गौप्यस्फोट
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (
Continue reading
Oil Crisis : जगावर पुन्हा तेलसंकटाचे सावट; स्वतःकडे मर्यादित कच्चे तेल असूनही भारत ठरणार जगासाठी महत्त्वाचा आधार, जाणून घ्या कारण
मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष, इराण-अमेरिका तणाव आणि...
Continue reading
Monsoon Diet Tips : पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाचे गंभीर आजार टाळण्यासाठी जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
पावसाळा सुरू होताच वातावरण...
Continue reading
Aamir Khan Third Marriage : 'मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे'; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरील टिप्पणीबाबत नितेश राणेंचं स्पष्टीकरण
बॉलिवूड अभिनेता आमिर खान ...
Continue reading
Soft Roti Tips : चपात्या तव्यावरून काढताच कडक होतात? ना जास्त तेल, ना फक्त पाणी; कणिक मळताना ‘हे’ दोन पदार्थ वापरा, पोळ्या दिवसभर राहतील मऊ
अनेक घरांमध्ये सकाळी बनवलेल्या चपात्या ...
Continue reading
Sonam Wangchuk Health Update : 17 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; दिल्ली हायकोर्टाची केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस
सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते
Continue reading
Just Dial Share Price : गुंतवणूकदारांची चांदी! 'जस्ट डायल'च्या शेअरने अवघ्या दोन दिवसांत 36% उसळी; ब्रोकरेजकडून 1,110 रुपयांचे टार्गेट
भारतीय शेअर बाजारा...
Continue reading
Supriya Sule : 'हा प्रश्न मला नाही, देवेंद्र फडणवीसांनाच विचारा'; जयंत पाटील यांच्या वर्षा भेटीवर सुप्रिया सुळेंची स्पष्ट भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष...
Continue reading
School Sex Education : शाळांमध्ये लवकरच लैंगिक शिक्षण? केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; तज्ज्ञ समितीचा अहवाल तयार
देशभरातील शाळांच्या अभ्यासक्रमात
Continue reading
Delimitation Bill : 50 टक्के फॉर्म्युल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा? खासदारांच्या जागांबाबत सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
Delimitation Bill
Continue reading
श्रीयश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवडणुकीत आश्वासने, प्रत्यक्षात शून्य कर्जमाफी!
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.
मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही,
अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच मार्च महिन्याच्या अखेरीस बँकांकडून कर्जफेडीचा दबाव टाकण्यात येत
असल्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडले आहेत, असेही नमूद करण्यात आले.
नुकसानीने गांजलेला शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर
निरंतर नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढते उत्पादन खर्च आणि बँकांचे दडपण यामुळे
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या
अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहेत.
“शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असून, अशा प्रकरणांमध्ये खुनाचे गुन्हे दाखल करावेत,”
अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कायद्याने सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करा – राष्ट्रवादी काँग्रेस
शेतकरी विरोधी धोरणांमुळे ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झाले आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून दिलेल्या निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करावी,
अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते:
या निवेदनप्रसंगी जिल्हा बुथ कमिटी प्रमुख कैलास गोंडचर, तालुकाध्यक्ष श्रीयश चौधरी, सिकंदर मर्दाने,
माजी नगरसेवक विवेक बोचे, कृ.उ.बा.सं. संचालक धीरज हिंगणकर, तसेच अविनाश जायले,
अंकुश चौधरी, रोशन कंकाळे, आश्विन चौधरी, राम देशमुख, हनुमंत चौधरी, मंगळे, अब्रक शेख,
अजीत शेख, अलीम शहा, आकाश चव्हाण, योगेश इंगोले, प्रमोद लहाने, गजानन पडोळे,
कैलास कोटकर, नरेंद्र कोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.