अकोला – महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाने १ एप्रिल २०२५ पासून
फेस रेटीना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अनिवार्य केली आहे.
यानुसार जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दररोज बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.
Related News
धक्कादायक! उमरा गावात चवताळलेल्या माकडाचा हैदोस; 10 दिवसांत 3 जण जखमी
Apple vs OpenAI: 5 मोठे खुलासे! इलॉन मस्क यांचा सॅम ऑल्टमनवर जहरी हल्ला, टेक विश्वात खळबळ
5 मोठे प्रश्न! व्हायरल वैदूच्या व्हिडिओंवर गिरीश परदेशी संतप्त; लहान मुलांच्या संस्कारांवर व्यक्त केली चिंता
गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच येणार 10 किलोचा नवीन LPG सिलिंडर
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर मोठा दावा; ‘सर्व माहिती शरद पवारांना होती’
भजी मऊ पडतात? मग ‘या’ 5 किचन ट्रिक्स वापरा आणि मिळवा कुरकुरीत चव
24 वर्षांनंतर समोर आली ‘देवदास’च्या कलाकारांच्या फीची रक्कम; माधुरीने ऐश्वर्यालाही टाकलं मागे
इराणमध्ये रशियाचे TU-214PU विमान दाखल; मध्य पूर्वेतील तणावात नव्या चर्चांना उधाण
RBI क्रिप्टोवर बंदीच्या भूमिकेवर ठाम; भारतातील 3.9 कोटी गुंतवणूकदारांची वाढली चिंता
कढी वारंवार फाटते? मग स्वयंपाक करताना ‘या’ 5 चुका अजिबात करू नका
5 मोठे सवाल! ‘विश्वगुरू’ दाव्यावर अनुराधा पौडवाल यांचा थेट हल्ला; मोदी सरकार आणि राम मंदिर देणग्यांवरही परखड टीका
एअर फ्रायरमध्ये बनवा ‘हे’ 6 टेस्टी कबाब; कमी तेलात मिळेल रेस्टॉरंटसारखी चव
मात्र, ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यामुळे मोठ्या अडचणींचा
सामना करावा लागणार असल्याने महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने
या प्रणालीतून आरोग्य कर्मचाऱ्यांना वगळण्याची मागणी केली आहे.
या मागणीसाठी संघटनेच्या वतीने केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव
यांना ३० मार्च २०२५ रोजी अकोला येथे निवेदन देण्यात आले.
आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच गावोगावी फिरून सेवा देणारे आरोग्य कर्मचारी,
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक आणि सहायिका यांना
बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करणे कठीण ठरणार आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संघटनेचे मत आहे.
संघटनेच्या वतीने निवेदन सादर
संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोकराव जयसिंगपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संगीता जाधव
आणि अमरावती आरोग्य सेविका इंद्रायणी राठोड यांनी हे निवेदन केंद्रीय मंत्र्यांना सादर केले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना या बायोमेट्रिक प्रणालीतून वगळण्याचा निर्णय लवकर घेण्यात यावा, अशी संघटनेची मागणी आहे.

