अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन
युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या
करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात खदान
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
पोलिसांनी एकूण 8 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी 4 आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मृतकाच्या कुटुंबाची न्यायासाठी लढा – फाशीची मागणी
या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आज अकोला शहरातील खदान
परिसरातून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
मृतक करण शितळेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.
घटनेची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी जेतवन नगर येथे किरकोळ कारणावरून तणाव निर्माण झाला होता.
ऑटोचा किरकोळ धक्का लागल्याने वाद वाढला आणि त्याचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले.
यात करण शितळे गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई
खदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मात्र,
मृतकाच्या कुटुंबीयांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरा पर्याय मान्य नसून,
त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
नागरिकांमध्ये संताप – कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने कायदा
व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,
अशी मागणी मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरिकांकडून केली जात आहे.