ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती.
Related News
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून स...
Continue reading
कोंडागाव | प्रतिनिधी
छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एका 19 वर्षीय मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने दोन वर्षे बलात्कार केला,
इ...
Continue reading
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि ...
Continue reading
मुंबई | क्रीडा प्रतिनिधी
IPL 2025 मध्ये आतापर्यंत अनेक थरारक सामने झाले. काही संघांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले,
तर आता उरलेल्या एक जागेसाठी लढत ...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशाबाहेर प्रवास करताना लागणारा पासपोर्ट आता अधिक सुरक्षित आणि डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.
भारतात 'पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0' अंतर्गत ई-पासपोर्ट (Electro...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजेदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे.
ही आग अभ्यागत प्रवेशद्वाराजवळील स्वागत कक्ष परिसरात ल...
Continue reading
प्रयागराज | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षण प्रकरणात मोठा निकाल समोर आला आहे.
इलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या सिव्हिल रिव्हिजन (पुनर्वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतामध्ये पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवणाऱ्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११ पाकि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या
युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर ये...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
'ऑपरेशन सिंदूर'नंतर तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय परदेश दौऱ्याच्या प्रतिनिधिमंडळात तृणमूल काँग्रेसने
(TMC) सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. TMC ने स...
Continue reading
शोपियां | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षाबळांना मोठं यश मिळालं आहे.
दहशतवाद्यांना साथ देणारे दोन सहयोगी पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून
शस्त्रास्त्रे...
Continue reading
उत्तर प्रदेश | प्रतिनिधी
उत्तर भारतात प्रचंड उष्म्याची लाट सुरू असताना, उत्तर प्रदेशातील सर्व परिषदीय व मान्यता
प्राप्त शाळांमध्ये २० मे २०२५ पासून उन्हाळी सुट...
Continue reading
आतापर्यंत एकूण नऊ हाफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे.
तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे.
मात्र दुसरीकडे काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहील असा दावा महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे.
दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपये नाही तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
याबाबत बोलताना सर्व सोंगं करता येतात परंतु पैशांचं सोंग करता येत नाही.
राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्यवेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली, त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 देणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
विरोधकांनी सुधरावं, आम्ही जे बोललो ते बोललो, काँग्रेसने देखील आश्वासन दिली होती, मात्र त्यांनी ती पाळली नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मात्र तरी देखील 2100 रुपये कधी मिळणार? याकडे आता राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.