मुंबई प्रतिनिधी |
भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’ ही केवळ एक इमारत नसून एक भव्य आणि विलासी राजवाडाच आहे.
मुंबईतील या 27 मजली गगनचुंबी इमारतीसाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
मात्र सर्वांत वरच्या मजल्यावरच अंबानी कुटुंब का राहते?
यामागची काही आश्चर्यकारक कारणं आता उघड झाली आहेत.
सर्वोच्च मजला – हवा, प्रकाश आणि वास्तुशास्त्र
अंबानी कुटुंब टॉप फ्लोअरवर राहते कारण तेथून सर्वोत्तम नैसर्गिक प्रकाश आणि हवा मिळते.
तसेच, वास्तुशास्त्रानुसार घराचे प्रमुख वास्तव्य वरच्या मजल्यावर असावे, असा विश्वास आहे.
म्हणूनच अंबानींनी 27 व्या मजल्यावर आपले निवासस्थान बनवले आहे.
पारंपरिक एसी नव्हे, खास ‘सेंट्रल कुलिंग सिस्टिम’
अँटिलियामध्ये पारंपरिक एअर कंडिशनर युनिट्स वापरले जात नाहीत, कारण त्याचे बाह्य युनिट्स इमारतीच्या सौंदर्यावर परिणाम करू शकतात.
त्याऐवजी, इथे एक विशेष सेंट्रल कुलिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे,
जी केवळ राहणाऱ्यांसाठी नाही, तर फुलं आणि कलाकृतींचे संरक्षण करण्यासाठीदेखील वापरली जाते.
थंडी कमी? व्यवस्थापकांचा नकार
या इमारतीत जर कोणी एसी कमी करण्याची विनंती केली,
तर व्यवस्थापन स्पष्ट नकार देते. कारण ही कुलिंग सिस्टिम मानवांच्या गरजांपेक्षा अधिक,
इमारतीतील मौल्यवान वस्तूंचे जतन करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.