श्रीकांत पाचकवडे
अकोला : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा दंड थोपटून आमने-सामने उभे ठाकलेल्या भाजप विरुद्ध काँग्रेस मध्ये काट्याची टक्कर झाली आहे. त्यामुळे मतदानानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केल्या जात असुन केंडर बेस भाजपमध्ये फिलगुडचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेसच्या लढतीत वंचीत विजयाचा मार्ग सुकर करेल कां? असाही कयास लावल्या जात आहे.
देशात लोकसभेच्या 18 व्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.26) मतदान घेण्यात आले. गत निवडणुकीत या मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजप विरुद्ध वंचीत अशी थेट लढत होऊन काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली होती.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
यंदा मात्र, भाजपच्या मराठा कार्डला काँग्रेसने मराठा कार्डनेच उत्तर दिल्याने मतदारसंघात सत्ताधारी भाजपचे अऩुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यातच थेट लढत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. मतदारसंघातील राजकीय समीकरण पाहता बाळापुर, अकोला पश्चिम, रिसोड मतदारसंघात काँग्रेसने हात मारल्याची चर्चा आहे. तर अकोला पुर्व, अकोट, अकोला पश्चिमचा काही भागात कमळ फुलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसच्या या लढतीत वंचीत बहुजन आघाडीनहेी सोशल इंजिनिअरिंगचा फंडा यशस्वी करण्यावर भर दिल्याचे बोलल्या जाते.
या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघ हा निर्णायक भुमिकेत असुन या मतदारसंघात मराठा, कुणबी, मुस्लीम, बौद्ध, माळी समाजाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिल खोलके डॉ. अभय पाटलांना साथ दिल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात सर्वांधिक 66.58 टक्के मतदान बाळापुर मतदारसंघात झाल्याचे पहावयास मिळाले.
एकदंरीत काही मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत तर काही ठिकाणी तिरंगी लढत झाल्याने विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. सध्या तरी प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार विजयी होईल, असे दावे करीत असले या निवडणुकीत मतदारराजा कोणाला लोकसभेत पाठवतो? हे चार जुनला जाहीर होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.