नागपूरजवळील खापरखेडा येथे मोबाईलचा हट्ट नाकारल्याने केवळ १३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. दिव्या सुरेश कौठारे असे मृत मुलीचे नाव असून ती आठवीत शिक्षण घेत होती. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चनकापूर येथील हनुमान मंदिराजवळील झोपडपट्टी भागात दिव्या राहत होती. तिला मोबाईलवर गेम खेळण्याची विशेष आवड होती. मात्र अभ्यास बिघडू नये आणि इतर कारणांमुळे पालकांनी तिला मोबाईल देण्यास वारंवार नकार दिला होता. यामुळे ती काही दिवसांपासून नाराज आणि तणावग्रस्त होती.
शुक्रवारी दुपारी घरात कोणी नसताना दिव्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. दुपारी आई आणि बहीण घरी परतल्यावर त्यांना दिव्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Related News
खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/railway-officer-mastwal-accused-of-shirking-responsibility/
