Eknath Shinde : औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सध्या तापले आहे.
ही कबर हटवावी अशी मागणी केली जात आहे.
Eknath Shinde : सध्या राज्यात खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
Related News
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली ही कबर हटवावी, अशी मागणी वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून केली जात आहे.
राज्यातील काही पक्ष आणि राजकीय नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी, अशी भूमिका घेतली आहे.
त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा हाच मुद्दा आता थेट दिल्लीदरबारी पोहोचण्याची शक्यता आहे.
खुद्द एकनाथ शिंदेच केंद्रीय नेतृत्त्वाशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीच्या नेतृत्त्वाशी चर्चा करणार?
मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
या दिल्लीवारीत ते औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा केंद्रीय नेतृत्त्वाकडे उपस्थित करण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असताना शिंदे यांच्या या दिल्लीवारीला चांगलेच महत्त्व आले आहे.
खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर ते दिल्लीतील नेतृत्वाशी बातचीत करण्याची शक्यता आहे.
याच भेटीत ते महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हटवण्याचा मागणीबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुक्तगिरी येथील पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला होतील रवाना होणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे?
विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांकडून राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवावी, ही मागणी घेऊन आंदोलन केले जात आहे.
याच मुद्द्यावर शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 मार्च रोजी पहिल्यांदाच भूमिका मांडली होती.
औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे, अशी शिवभक्तांची मागणी आहे. माझीही हीच भावना आहे,
असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. औरंगजेब महाराष्ट्राचा दुष्मन होता, राष्ट्रद्रोही होता, त्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे.
जे औरंगजेबाचे उदात्तीकरण करतात, त्यांना निषेध केला पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली होती.