जितापूरमध्ये वाघाचा कहर! सलग तिसऱ्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट, वन विभागावर रोष
जितापूर परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान वाघाने शेतकरी गजानन मंगळे यांच्या गाईवर हल्ला करून तिची शिकार केली. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.
विशेष म्हणजे, ही सलग तिसरी घटना असून याआधीही वसुबारसच्या दिवशी मंगळे यांच्या घराशेजारील गोठ्यातून वाघाने शिकार केली होती. या सततच्या हल्ल्यांमुळे जितापूर, शेलगाव, आणि जवळील खेड्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र दहशत निर्माण झाली आहे.
Related News
अकोट :अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या जनावरांवर लंम्पी, लाळ्या-खुरकुत (एफएमडी) व ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांनी थ...
Continue reading
ग्रामीण प्रशासनाचा कणा असलेल्या पोलीस पाटलांच्या योगदानाचा गौरव
प्रतिनिधी : देवानंद खिरकरअकोट : राज्यभरात दरवर्षी १७ डिसेंबर हा दिवस पोलीस पाटील द...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील जेष्ठ पत्रकार, संपादक, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक किशोर जयराम अवचार यांचा सन्मान करण्यासाठी भिम गीत गायनाच्या माध्यमातून आदरांजली कार्यक्रमाचे आयो...
Continue reading
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याच्या तीन पिल्लांचा आढळ झाल्याची घटना समोर आली असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ...
Continue reading
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
अकोट तालुक्यातील रांभापुर फाटा ते अकोट या मार्गाचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे चालत असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सावरा फाटा येथे १२ डिसेंबर रोजी
Continue reading
अकोला –शहराच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही अकोला आजही स्वच्छतेपासून रस्त्यांपर्यंत आणि वाहतूक व्यवस्थेपासून नागरिकांच्या मूलभूत गरजांपर्यंत गंभीर समस्यांनी...
Continue reading
अकोट – दिनांक ०७.१२.२०२५ रोजी अकोट पोलीस स्टेशनवर रात्री अंदाजे ९ वाजताच्या सुमारास पवन लक्ष्मण इंगळे (वय २७, रा. महेश कॉलनी, अकोट, जि. अकोला) आले आणि त्यांनी पोलीसांना माहिती दिली...
Continue reading
जगातील पहिल्या महिला सर्परक्षक आणि सर्पतज्ज्ञ, वनिता बोराडे यांनी राज्य शासन, शिक्षण आणि वन विभागाकडे शालेय शिक्षण अभ्यासक्रमात साप आणि वन्यजीव यांची वैज्ञानिक व शास्त्रीय माहिती स...
Continue reading
अकोटमध्ये भुईभार एसपी गॅस एजन्सीसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी; वाहतूक व्यवस्थेची अक्षरशः वाट लागली
पार्किंग व्यवस्थेअभावी नागरिक त्रस्त; सकाळी दीड तास वाहतूक संथ गतीने
अकोट – अकोट...
Continue reading
जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थळांची पाहणी; वनवैभव आणि आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘नरनाळा महोत्सव’ तयारीच्या अंतिम टप्प्यात
३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान भव्य आयोजन; सांस्कृतिक ...
Continue reading
गावातील नागरिकांनी सांगितले की, आता लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. संध्याकाळीच गावात संचारबंदीचे वातावरण असून, शेतात काम करतानाही शेतकरी भयभीत आहेत.
दरम्यान, गावकऱ्यांचा वन विभागावर तीव्र रोष आहे. “कागदी पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या नावाखाली वन विभाग फक्त भोपळा देतोय,” असा आरोप संतप्त ग्रामस्थ करत आहेत. त्यांनी त्वरित वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की, जर वन विभागाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर गाव बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
read also : https://ajinkyabharat.com/vijecha-dhak-basun-kamgarcha-death-2-lahan-mulinwar-aichi-responsibility/