उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आमने सामने आले.
मात्र, यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले देखील नाही.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समोरा समोर आले.
मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिले देखील नाही. तर, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये हस्तांदोलन झाले.
राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा विधानभवनात आमना सामना झाला.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सोबतच होते यावेळी त्यांच्या समोर उद्धव ठाकरे आले.
उद्धव ठाकरे यांनी हात जोडून नमस्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची धावती भेट जाली.
फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये हस्तांदोलन देखील झाले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे बघणं टाळलं.
एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरुन भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळीक होणे अशक्य असल्याची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी देखील उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक देखील केले होते.
आदित्य ठाकरेंनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल
आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत, मुंबईतील खड्ड्यांवरुन त्यांना टोला लगावला.
त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं मात्र मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत. असं आदित्य म्हणाले.
तर मुंबईत सुरु असलेल्या रस्त्यांच्या खोदकामावरुन आदित्य यांनी सरकारला टोला लगावला.
मुंबई महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदत आहे
की त्यांना खोदकामात काही तरी सापडणार असावं असं वाटतं, असं आदित्य म्हणाले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/akot-yehetha-mahabodhi-mahavihar-mahamuktisathi-movement/