नवी दिल्ली : ‘फौजदारी खटल्यांच्या सुनावणीदरम्यान उलटलेल्या साक्षीदारांची प्रभावी आणि अर्थपूर्ण उलटतपासणी सरकारी वकिलांकडून बिलकुल होताना दिसत नाही,’ असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सुनावले. ‘न्यायालयांनी केवळ टेपरेकॉर्डरसारखे काम करू नये, सुनावणीमध्ये सहभागाची भूमिका घेणे गरजेचे आहे,’ या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
‘सत्य प्रस्थापित करणे आणि न्यायाचे उद्दिष्ट साध्य करणे हे न्यायालयांचे कर्तव्य आहे. त्यासाठी न्यायाधीशांनी कार्यवाहीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सरकारी वकील कामात उदासीन किंवा आळशी असेल, तरीही सत्य समोर यावे यासाठी न्यायालयाने कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवले पाहिजे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
पत्नीच्या हत्येप्रकरणी १९९५मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीच्या शिक्षेवर न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्या वेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही निरीक्षणे नोंदवली. या पीठामध्ये न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचाही समावेश होता.
Related News
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अनेकजण जखमी झाले आहेत.
स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्...
Continue reading
Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका पाहायला मिळत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सु...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा
...
Continue reading
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत.
याआधी त्यांनी रशिया दौऱ्यादरम्यान व्लादीमीर पुतिन
आणि इतर उच्चपदस्थांशी चर्चा केली.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध...
Continue reading
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांबाबत मोठा निर्णय दिला.
सीआरपीसीच्या कलम १२५ नुसार मुस्लीम महिला तिच्या पतीकडून
पोटगीची मागणी करू शक...
Continue reading
भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा
आणि फौजदारी प्रक्रिया संहिता हे तीन सुधारित फौजदारी कायदे
1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून देशात लागू झाले आहेत.
गेल्या वर्षी संसदे...
Continue reading
CBI च्या अटकेविरोधात दिले आव्हान..
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री
आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्...
Continue reading
जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
पाकिस्तानमध्ये बसून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या
पाच दहशतवाद्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती पोलिसांनी जप्त केली आहे.
स्थानिक न्यायालयाने दिल...
Continue reading
सर्व उड्डाणे रद्द; एक ठार, सहा जखमी
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर
आज सकाळी मोठा अपघात झाला.
विमानतळाच्या टर्मिनल-1 वर पावसामुळे छत कोसळल्याने
मोठा अपघ...
Continue reading
65 टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द..
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना
Continue reading
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : उत्तराखंडात जंगलांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील, असे सर्...
Continue reading
देशभरातील लाखो बँक कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात म्हटले की, आता बँक कर्मचाऱ्यांना निय...
Continue reading
‘सरकारी वकिलांच्या गंभीर त्रुटी आणि कर्तव्याप्रति निष्काळजी यांचे भान न्यायालयाने ठेवावे, एखाद्या व्यक्तीविरोधातील गुन्हा हा संपूर्ण समाजाच्या विरोधातील गुन्हा आहे. त्यामुळे सरकारी वकील किंवा कनिष्ठ न्यायालयांचे पीठासीन अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे निष्काळजी किंवा कसूर करणे परवडणारे नाही,’ असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
नियुक्त्यांमध्ये राजकारणाला थारा नको
‘सरकारी वकिलांची सेवा आणि न्यायपालिका यांच्यातील संबंध हा फौजदारी न्याय व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे सरकारी वकील पदावर नियुक्तीसारख्या बाबींमध्ये राजकारणाला थारा मिळू नये,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
पत्नीच्या हत्येप्रकरणी झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अर्जदाराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या जोडप्याची पाच वर्षांची मुलगी हत्येच्या गुन्ह्याची एकमेव साक्षीदार होती. सुनावणीदरम्यान ही अल्पवयीन मुलगी साक्ष देऊ न शकल्याने तिला उलटलेला साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, ‘अर्जदाराने निशस्त्र, असहाय पत्नीवर चाकूने १२ वार केले होते, ही बाब दुर्लक्षित करण्याजोगी नाही,’ असे म्हणून न्यायालयाने शिक्षेविरोधातील अपील फेटाळले.