मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शरद पवार
गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
Related News
मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती मार्गावर आता एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रक...
Continue reading
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले आहे. राज्य सरकारने जाहीर ...
Continue reading
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संत...
Continue reading
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीने काही महिन्यांपूर्वी राज्यभरात चांगलीच चर्चा रंगवली होती. या निवडणुकीत राजकीय वजनदार नेते...
Continue reading
बारामतीच्या राजकारणात मंगळवारी एक अनपेक्षित आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार आणि कार्यकारी अध्यक्ष Supriya Sule यांनी थेट महायु...
Continue reading
राज्यातील आणि देशातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून Uddhav Thackeray यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी Bharatiya Janata Party वर...
Continue reading
राज्यातील आणि देशातील राजकारण सध्या महिला आरक्षण विधेयकावरून चांगलेच तापले आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन बिल) अपेक्षेप्रमाणे मार्गी न लागल्याने सत्ताधारी आणि वि...
Continue reading
महाराष्ट्रातील आयटी क्षेत्रात सध्या मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. Tata Consultancy Services (TCS) च्या नाशिक शाखेतील कथि...
Continue reading
भारतीय संगीतविश्वातील अजरामर गायिका Asha Bhosle यांच्या निधनानंतर देशभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या योगदा...
Continue reading
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर मोठा राजकीय आरोप करत देशाच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस पक्...
Continue reading
आगामी पावसाळ्यातील संभाव्य तांत्रिक अडथळे, वादळ-वारा आणि अतिवृष्टीमुळे उद्भवणारे वीज संकटाचे धोके टाळण्यासाठी महावितरणने आतापासूनच व्यापक तयारी सुर...
Continue reading
मुंबई क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा एक भावनिक आणि ऐतिहासिक सोहळा Wankhede Stadium येथे पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्रा...
Continue reading
विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली असून जनावरांचे जीवितहानीचे प्रकारही
घडले आहेत. मात्र, अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत आणि जे झाले आहेत त्यांनाही मदत मिळालेली नाही, असा आरोप शिंदे यांनी केला. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ
जाहीर करून एकरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने दुर्लक्ष केले तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू, असा इशारा देखील शिंदे यांनी दिला. महायुती सरकारने निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले
होते. मात्र, अद्याप सरसकट कर्जमाफीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात येऊन अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेतला. राज्यातील अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात
आला आहे. तापी, हतनूर, अंबा-जगबुडी, वशिष्टी या नद्यांवर पाणीपातळी वाढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईसह राज्यात पुढील काही दिवसांमध्ये अजून जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार, मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की,
शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पावसामुळे झालेल्या शेती व जनजीवनाच्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली असून आता राज्य सरकारची
भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/vice-presidential-padasathi-nda-cha-umedwar-jaheer/