मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शरद पवार
गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
Related News
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण...
Continue reading
मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनापूर्वी मोठी खलबतं; फडणवीस-बावनकुळे बैठक, तोडगा निघणार?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची श...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; करपलेल्या पिकांचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण, नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा
Maharashtra Farmer News...
Continue reading
Prasad Oak म्हणजे ‘धर्मवीर आनंद दिघे’! फडणवीसांच्या कौतुकानंतर अभिनेता नतमस्तक
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता, दिग्दर्शक आणि परीक्षक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्य...
Continue reading
मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे; आधुनिक फिल्म सिटी उभारणार – मुख्यमंत्री Devendra Fadnavis
मराठी चित्रपटसृष्टीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले ...
Continue reading
संभाजीनगरात बसून दंगल घडवण्याचं षडयंत्र; काही झालं तर एकनाथ शिंदे जबाबदार – Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठ...
Continue reading
गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर संजय राऊत स्पष्ट; अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचे केले समर्थन
संजय राऊत : नवरात्री उत्सवाला सुरुवात ह...
Continue reading
DJ बंदीवरून संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, “धोरणात्मक निर्णय घेण्याची हिंमत आहे का?”
DJ आणि लेझरवरील बंदीच्या मुद्द्यावरून राज्यातील...
Continue reading
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
अजितदादांच्या अपघाताबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं समर्थन, राष्ट्रवादीच्या आमदारांवरही सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री
Continue reading
Fadnavis उपपंतप्रधान होणार? संघाच्या हालचालींचा संजय राऊतांचा दावा; मोदींच्या वारसदाराच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ
Chief Mi...
Continue reading
गणेशोत्सवात डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात पुन्हा एकद...
Continue reading
विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली असून जनावरांचे जीवितहानीचे प्रकारही
घडले आहेत. मात्र, अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत आणि जे झाले आहेत त्यांनाही मदत मिळालेली नाही, असा आरोप शिंदे यांनी केला. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ
जाहीर करून एकरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने दुर्लक्ष केले तर आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू, असा इशारा देखील शिंदे यांनी दिला. महायुती सरकारने निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले
होते. मात्र, अद्याप सरसकट कर्जमाफीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात येऊन अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेतला. राज्यातील अनेक भागात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात
आला आहे. तापी, हतनूर, अंबा-जगबुडी, वशिष्टी या नद्यांवर पाणीपातळी वाढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबईसह राज्यात पुढील काही दिवसांमध्ये अजून जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार, मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की,
शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पावसामुळे झालेल्या शेती व जनजीवनाच्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली असून आता राज्य सरकारची
भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/vice-presidential-padasathi-nda-cha-umedwar-jaheer/