मुंबई | प्रतिनिधी —
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधून मायभूमीकडे
परतण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली आहे. मात्र, या संकटकाळात काही
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
विमान कंपन्यांनी तिकीट दरात प्रचंड वाढ केल्याने नेटीझन्समधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीनगरहून मुंबई आणि इतर शहरांकडे जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर तब्बल तीनपट वाढले आहेत.
काही प्रवाशांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत 56,000 रुपयांपर्यंत वाढलेले तिकीटदर दाखवले आहेत.
संकटकाळात ‘संधी’ शोधणाऱ्या या प्रवृत्तीवर नेटीझन्सनी कठोर शब्दांत टीका केली आहे.
ही बाब लक्षात घेत नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) ने 23 एप्रिल रोजी महत्वाचे आदेश
जारी करत विमान कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तिकीट दर न वाढवणे,
तसेच तिकीट रद्द/पुन्हा बुकिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, श्रीनगरहून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी मिळून श्रीनगरहून उड्डाण करणारी चार अतिरिक्त विमाने उपलब्ध करून दिली आहेत,
त्यातील दोन मुंबईसाठी आणि दोन दिल्लीसाठी असणार आहेत.
सध्या हजारो पर्यटक आणि अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविक श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
त्यांच्यासाठी ही अतिरिक्त सेवा उपयोगी ठरणार आहे. DGCA च्या आदेशामुळे काहीसा दिलासा मिळाला असला,
तरी एअरलाईन्सकडून ‘संकटात नफा’ हे वर्तन थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhavatiya-cruel-stomach/