मुंबई | प्रतिनिधी —
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधून मायभूमीकडे
परतण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली आहे. मात्र, या संकटकाळात काही
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
विमान कंपन्यांनी तिकीट दरात प्रचंड वाढ केल्याने नेटीझन्समधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीनगरहून मुंबई आणि इतर शहरांकडे जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर तब्बल तीनपट वाढले आहेत.
काही प्रवाशांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत 56,000 रुपयांपर्यंत वाढलेले तिकीटदर दाखवले आहेत.
संकटकाळात ‘संधी’ शोधणाऱ्या या प्रवृत्तीवर नेटीझन्सनी कठोर शब्दांत टीका केली आहे.
ही बाब लक्षात घेत नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) ने 23 एप्रिल रोजी महत्वाचे आदेश
जारी करत विमान कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तिकीट दर न वाढवणे,
तसेच तिकीट रद्द/पुन्हा बुकिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, श्रीनगरहून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी मिळून श्रीनगरहून उड्डाण करणारी चार अतिरिक्त विमाने उपलब्ध करून दिली आहेत,
त्यातील दोन मुंबईसाठी आणि दोन दिल्लीसाठी असणार आहेत.
सध्या हजारो पर्यटक आणि अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविक श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
त्यांच्यासाठी ही अतिरिक्त सेवा उपयोगी ठरणार आहे. DGCA च्या आदेशामुळे काहीसा दिलासा मिळाला असला,
तरी एअरलाईन्सकडून ‘संकटात नफा’ हे वर्तन थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhavatiya-cruel-stomach/