शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञता दाखवावी असे राऊत म्हणाले. त्यांनी शिंदेंच्या भाषेवर आणि मोदी-शहा यांच्या
आधारावर अवलंबून राहण्यावरून चिंता व्यक्त केली. राऊतांनी शिंदेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
Related News
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
वडील दीपक यादव यांनी राधिकेवर ५ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ४ गोळ्या लागून तिचा ज...
Continue reading
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचावा यासाठी महाराष्ट्र सरकार समन्वित योजना राबवणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की, विविध विभाग...
Continue reading
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून,
शशिकांत शिंदे यांची नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. १५ जुलै रोजी नवा प...
Continue reading
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी अकोला जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभावाने झालेल्या ज्वारी खरेदीत मोठ...
Continue reading
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी
झाल्याची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना वार्ड क्रमांक ...
Continue reading
नागपूरच्या खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कौलखेड परिसरात एका ३२ वर्षीय युवकावर चार मारेकऱ्यांनी
चाकू आणि लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडल...
Continue reading
आज 12 जुलै 2025 रोजी अकोला जिल्ह्यात एक विस्मयकारक नैसर्गिक घटना पाहायला मिळाली.
दुपारी 12 ते 12:15 दरम्यान आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्यसारखे वलय,
म्हणजेच सूर्य प्रभामंडल (Sun ...
Continue reading
गुरुवारी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केलं त्यानंतर त्यावर चर्चा झाली
आणि नंतर आवाजी मतद...
Continue reading
संग्रामपूर प्रतिनिधी-
वारी हनुमान येथील डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 जुलै रोजी दुपारी 2.30
वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव अक्षय सिध्दार्थ भोजने रा. ...
Continue reading
अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत
गोवंश कारवाई करून एका बैल जोडीला जीवनदान दिले आहे.
ही कारवाई बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली.
दरम्यान, गायगाव ...
Continue reading
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
Continue reading
राज्यभरात शहरांच्या नामांतराची लाट सुरू असताना, पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण
‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी ठाम मागणी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे.
त्यांनी जिज...
Continue reading
एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी कृतज्ञ असलं पाहिजे.
तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झाले आहेत, तुम्ही आमच्यावर टीका करता,
आम्ही तुमच्यावर करतो,पण ज्या प्रकारची भाषा ते ( शिंदे) उद्धव ठाकरेंबद्दल
वापरता, त्यांनी स्वत:चं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या दिवशी मोदी-शहांचं छत्र तुमच्यावर नसेल,
ते छप्पर उडेल तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा विचार शिंदे आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत
किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरांच्या गाभाऱ्यात बसून करायला हवा, अशा शब्दांत
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना थेट सुनावलं.
आज एकनाथ शिंदे हे स्वत:चं जे आर्थिक, सत्तेचं वजन दाखवत आहेत,
त्याचं मूळ उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उर्जेमध्ये आहे ना.
उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उर्जा दिली नसती तर… ही अशी उर्जा त्यांना देऊ नका, हा माणूस घात
करेल हे सांगणारे लोकं आज त्यांच्याच ( शिंदेच्या) अवतीभवती आहेत ठाण्यातले.
ठाण्यात जे आमदार , खासदार आहेत ना आसपासचे, हे सगळे उद्धव ठाकरेंना ‘मस्के’ लावायला आले होते,
असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला. साहेब हे करू नका, हा माणूस ( शिंदे) तुम्हाला दगा देईल,
याची नियत चांगली नाही, हे सांगणारे लोकंच आज त्यांच्या भोवती आहेत.
आम्ही त्याला साक्षीदार आहोत, असा दावा करत एकनाथ शिंदेंनी जपून पावलं टाकावी, असेही राऊत म्हणाले.
राज्यकर्त्यानं जर टीका सहन केली तर तो दोन पाऊल पुढं जातो , आणि विशेषत:
ज्याने आपल्यावर सुरूवातीच्या काळापासून मेहेरबानी केली आहे, भरभरून दिलं आहे,
त्याच्याबाबतीत जपून केलं पाहिजे.
छगन भुजबळांनी ते पथ्य पाळलं होतं,गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो, त्यांनीही पक्ष सोडल्यावर शिवसेना आणि
मा. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर काहीच टिप्पणी केली नाही, कारण ते कृतज्ञ होते.
नाहीतर मोदी-शहा, फडणवीसांनी दारातही उभं केलं नसतं..
त्यांनी ( ठाकरे कुटुंबाने) तुम्हाला दिलं म्हणून तुमची आज किंमत वाढली ना,
नाहीतर मोदी-शहांनी आज तुम्हाला विचारलंही नसतं. मोदी, शहा आणि फडणवीस तुम्हाला दारात उभं करणार नाहीत,
त्यांची नियत काय आहे हे मला माहीत आहे ना. शिवसेना फोडण्याची तुमची क्षमता होती
म्हणून तुम्हाला जवळ केलं. तुमच्यात फार मोठी कर्तबगारी आहे किंवा तुम्ही महाराष्ट्रासाठी,
देशासाठी फार मोठं सामाजिक कार्य केलं, म्हणून त्यांनी तुम्हाला ( शिंदे) आश्रय दिला नाही.
तुम्ही त्यांच आश्रित आहात कारण पैशांच्या ताकदीवर
तुम्ही शिवसेना फोडू शकलात म्हणूनच, अशी टीका राऊत यांनी केली.