पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा येथे मेहमूद शाह यांच्या घरात
अचानक ३५ ते ४० रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याची घटना शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजीच्या सकाळी उघडकील आली,
रानडुकरांच्या धुमाकूळमुळे महेमुद शहा यांचा ११ वर्षीय मुलगा रोशन शहा जखमी झाला आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
पिंपळखुटा परिसरात रानडुकरांचा शेत शिवारात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ सुरू
असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
आता रानडुकरांनी गावाकडे मोर्चा वळविल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
३५ ते ४० रानडुकरांचा झुंड अचानक पिंपळखुटा येथील मेहमूद शाह यांच्या घरात घुसून धुमाकूळ घातला,
यामध्ये घरातील फ्रिज टीव्ही व हरभरा तुर आदी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानडुकरांचा
झुंड गावात घुसल्याने गावात एकच तारांबळ उडाली होती.रानडुकरांचा झुंड मेहमूद् शहा यांच्या घरात घुसल्याने
कुटुंबातील सदस्य भयभीत झाले झाल्याने पळापळ झाली, आणि काही ग्रामस्थांनी घराचे द्वार लावून दिले,
त्यामुळे रानडुकरांचा चार तासापर्यंत घरात धुमाकूळ सुरू असल्याने महेमूद शाह यांचे
घरातील हजारो रुपयांच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे.आलेगाव वन विभागाचा अनागोंदी कारभार
शुक्रवार रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास रानडुकरांचा झुंड घरात घुसल्या
बाबतची माहिती आलेगाव वन विभागाला देण्यात आली, परंतु चार तासापर्यंत अद्यापही वन विभागाचा एकही
कर्मचारी फिरकला नव्हता तोपर्यंत गावात दहशतीचे वातावरण पसरले होते.
अखेर ४ ते पाच तासानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रानडुकरांना जंगलात सोडण्यात आले..
Read more news here : https://ajinkyabharat.com/resharcard-holder/