पश्चिम महाराष्ट्रातील भाजप मंत्री जयकुमार गोरे यांवर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप आहे.
काँग्रेस नेत्यांनी केलेल्या या आरोपांना गोरे यांनी खंडन केले आहे.
ते म्हणाले की, 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे.
त्यांनी आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला आणि राजकीय विरोधकांवर टीका केली आहे.
Related News
गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली हो
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत.
त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार
संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील तसेच अंजली दमानिया यांनी गोरेंवर कडाडून टीका केली.
विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे. याच सर्व आरोपांच्या,
घटनांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली.
आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार जयकुमार यांनी केला.
या देशात लोकशाही आहे, आपल्या समोर सर्वोच्च न्यायलय आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाला ( 2019) आता सहा वर्ष झाली आहेत.
आज सहा वर्षांनंतर हा विषय पुन्हा समोर आला आहे. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा,
याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असं मला वाटत. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाने,
ज्या वडिलांनी कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत पोहोतचवलं, त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांचं अस्थिविसर्जन सुद्धा करू दिलं नाही.
एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं हे मला अपेक्षित नव्हतं.
