नवी दिल्ली : ‘पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही. मात्र, सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचीही गरज नाही. तेथील नागरिक काश्मीरमधील विकास पाहून स्वत:च भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करतील’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. राजनाथ यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील स्थिती, पाकिस्तान, चीनशी संबंध, घटनाबदलाची काँग्रेसकडून व्यक्त होणारी भीती आदी विषयांवर भाष्य केले.
‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तिथे आर्थिक विकास वेगाने होत असून, शांतताही नांदू लागली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापरच करावा लागणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता स्वत:च भारतात सामील होण्याची मागणी करतील. अशी मागणी आता होऊ लागली आहे’, असे राजनाथ सिंह म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर आमचे होते, आहे आणि राहील, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा काश्मीरमध्ये लागू करण्याची आवश्यकताच उरणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच याबाबतचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबत निश्चित कालमर्यादा सांगण्यास त्यांनी नकार दिला.
Related News
डोनाल्ड ट्रम्पचा दिग्गज प्रशंसा लेख — "असिम मुनीर, शेहबाज शरिफ महान लोक"; पाकिस्तान-अफगाण युद्ध लवकरच सुटवेन — ट्वीक आणि आंतरराष्ट्रीय मागोवा
अमेरि...
Continue reading
चीन तैवान संघर्षाची पार्श्वभूमी
चीन आणि तैवान यांच्यातील संघर्ष जागतिक राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो, तर त...
Continue reading
अमेरिका-चीन व्यापार युद्ध: जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, भारतावरही परिणाम – आयएमएफचा थेट इशारा
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव सध्या जागति...
Continue reading
काश्मीर मुद्दा: रशियाची पाकिस्तानला पहिल्यांदाच खरी सुनावणी
काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर च...
Continue reading
आणखी एक धोका : अमेरिका चीनवर 500 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
चीनवर 500 टक्के टॅरिफ लावण्याचा विचार सध्य...
Continue reading
चीन युद्धाला घाबरत नाही; अमेरिकेला थेट धमकी, व्यापार युद्धाची दाट शक्यता
आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाल...
Continue reading
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अनेकजण जखमी झाले आहेत.
स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्...
Continue reading
Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका पाहायला मिळत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सु...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
लष्कराकडून एका पाकी घुसखोराचा खात्माजम्मू-काश्मीरनजीक न...
Continue reading
'या' खेळाडूंना मिळू शकते संधीभारतीय क्रिकेट बोर्ड आज श्रीलंका दौऱ्यासाठीटीम इंडिय...
Continue reading
पीटीआय पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय
पाकिस्तानच्या तुरुंगात बंद अस...
Continue reading
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया कोणत्याही स्थितीत थांबायला हव्यात, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला बजावले. या दहशतवादी कारवायांवर भारताची करडी नजर असेल, असे सांगताना राजनाथ यांनी दहशतवादाबाबत सहनशून्य भूमिकेचा पुनरुच्चार केला.
समुद्री चाच्यांविरोधात भारतीय नौदलाच्या कारवाईचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. एडनचे आखात, तांबड्या समुद्रात चाच्यांविरोधात कारवाई करीत नौदलाने व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे राजनाथ म्हणाले.