नवी दिल्ली : ‘पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही. मात्र, सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचीही गरज नाही. तेथील नागरिक काश्मीरमधील विकास पाहून स्वत:च भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करतील’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. राजनाथ यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील स्थिती, पाकिस्तान, चीनशी संबंध, घटनाबदलाची काँग्रेसकडून व्यक्त होणारी भीती आदी विषयांवर भाष्य केले.
‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तिथे आर्थिक विकास वेगाने होत असून, शांतताही नांदू लागली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापरच करावा लागणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता स्वत:च भारतात सामील होण्याची मागणी करतील. अशी मागणी आता होऊ लागली आहे’, असे राजनाथ सिंह म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर आमचे होते, आहे आणि राहील, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा काश्मीरमध्ये लागू करण्याची आवश्यकताच उरणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच याबाबतचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबत निश्चित कालमर्यादा सांगण्यास त्यांनी नकार दिला.
Related News
भारताने अमेरिका आणि चीनला मागे टाकत रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स (RNI )2026 मध्ये ठरवलं स्थान
भारतातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे की,
Continue reading
पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का; मित्र देश Turkey नेच केली मोठी पोलखोल, थेट पाकच्या संरक्षण धोरणावर भाष्य
Turkey हा मध्य आशिया आणि युरोपला जोडणारा महत्त्...
Continue reading
Arab Nations Summit In India : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, मुस्लिम देशांच्या बैठकीचं यजमानपद भारताकडे, पाकिस्तानला सणसणीत चपराक
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय स्त...
Continue reading
Iranने मानले थेट भारताचे आभार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट; चीन-पाकिस्तानही एकाच बाजूला
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा राजकीय आणि लष्करी अस्थिरतेचे ढग गडद होत आहेत. अमेरिका आणि
Continue reading
जगातले 22 मुस्लिम देश आपल्या कृतीतून भारतावर दाखवणार विश्वास; पाकिस्तानला सणसणीत चपराक
पाकिस्तान नेहमीच स्वतःला मुस्लिम जगताचा तथाकथित नेता म्हणून साद...
Continue reading
पाकिस्तानची रणनीती: शी जिनपिंगचा पाकिस्तान दौरा आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील राजकीय संबंध इतिहासभर तणावपूर्ण राहिले आहेत. ...
Continue reading
India–पाकिस्तान एकाच मंचावर? ट्रम्प यांच्या ‘गाझा प्लॅन’मुळे जागतिक राजकारणात खळबळ
India आणि पाकिस्तान एकत्र येणार? हा प्रश्न सध्या आंतरराष्ट्रीय राजकार...
Continue reading
अमेरिका अध्यक्ष Donald Trump यांनी 75 देशांच्या नागरिकांना व्हिसा नाकारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. भारत या यादीत नाही, पण इराण, पाकिस्तान, रशि...
Continue reading
डोनाल्ड Trumpच्या निर्णयांमुळे जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर, एकटाच रोखू शकतो Trumpचा दावा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड Trump गेल्या काही दिवसां...
Continue reading
एका उंदरामुळे ठरणार मानवजातीचे भविष्य?
Chinaचा अंतराळातील ऐतिहासिक प्रयोग आणि मानवी वस्तीच्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल अंतराळात मानवी वस्ती स्थापन क...
Continue reading
Pakistanच्या हात लागला मोठा खजिना: तेल आणि गॅसच्या नश्पा ब्लॉकमधील भांडारामुळे देशाच्या भविष्यातील आर्थिक परिस्थितीवर होणार परिणाम
Pakistanने गेल्या ...
Continue reading
भारताने पाकिस्तानात दाखवली ताकद, ढाकामधील हस्तांदोलनाचा फोटो चर्चेत
Continue reading
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया कोणत्याही स्थितीत थांबायला हव्यात, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला बजावले. या दहशतवादी कारवायांवर भारताची करडी नजर असेल, असे सांगताना राजनाथ यांनी दहशतवादाबाबत सहनशून्य भूमिकेचा पुनरुच्चार केला.
समुद्री चाच्यांविरोधात भारतीय नौदलाच्या कारवाईचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. एडनचे आखात, तांबड्या समुद्रात चाच्यांविरोधात कारवाई करीत नौदलाने व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे राजनाथ म्हणाले.