चार ते पाच घरे फोडून रोकड आणि दागिन्यांची चोरी
पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पातुर (प्रतिनिधी): पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम देऊळगाव येथे 25 मार्चच्या
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास
केल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरीचा सविस्तर घटनाक्रम:
चोरट्यांनी पत्रकार गोपाल बदरके आणि त्यांचे भाऊ संदीप बदरके यांच्या घरात प्रवेश
करून 1.58 लाख रुपये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 4.33 लाखांचा ऐवज चोरून नेला.
बदरके यांनी शेत विहीर बांधकामासाठी बँकेतून मोठी रक्कम काढली होती, जी कपाटात ठेवली होती.
त्यांच्या घरातील दरवाज्याला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला.
तसेच, राजेंद्र बळकार, मनोहर कराळे, कैलास राठोड आणि शंकर गोळे यांच्या घरांवरही
चोरट्यांनी डल्ला मारला.
काही घरांतून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने लंपास करण्यात आले, तर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला.
पातुर पोलिसांवर नागरिकांचा रोष:
या घटनेनंतर गावकऱ्यांनी पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
👉 गावातील सुरक्षितता धोक्यात आली असून पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
👉 पातुर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 50-60 कर्मचारी असले तरी
रात्री गस्त कमी असल्याने चोरटे फायदा घेत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
गुन्हा दाखल:
या प्रकरणी गोपाल बदरके यांनी पातुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली असून अज्ञात
चोरट्यांविरुद्ध IPC कलम 331, 4, 305 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.