नवी दिल्ली | १३ मे २०२५
“ऑपरेशन सिंदूर”द्वारे पाकिस्तान आणि तिथे आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना जोरदार चपराक दिल्यानंतर
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट दिली.
Related News
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
Continue reading
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
ही तीच जागा आहे जिथे पाकिस्तानने खोटा दावा करत म्हटले होते की,
त्यांनी भारताच्या सैन्य तळांवर हल्ला करून S-400 प्रणाली उद्ध्वस्त केली आहे.
🇮🇳 जवानांमध्ये उत्साह, “भारत माता की जय” चा निनाद
एअरबेसवर पोहोचताच पंतप्रधान मोदींनी जवानांशी संवाद साधला.
त्यावेळी परिसरात “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” चे घोष जोरात ऐकू येत होते.
जवानांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि उत्साह स्पष्ट दिसत होता.
पंतप्रधान मोदींनी भेटीनंतर सोशल मीडियावर लिहिलं,
“आज सकाळी मी आदमपूर एअरफोर्स स्टेशनला गेलो आणि आपल्या शूर वीर जवानांना भेटलो.
त्यांचं साहस, निर्धार आणि निडरता अनुभवणं ही अत्यंत विशेष गोष्ट होती.
देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांचे आपण नेहमीच ऋणी राहू.”
पाकिस्तानचा खोटेपणा उघड
पाकिस्तानने 9-10 मे रोजी आदमपूर आणि सिरसा एअरबेसवर JF-17 फायटर जेटमधून हायपरसोनिक
क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला होता. मात्र, भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने हा हल्ला निष्फळ ठरवला.
विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत हे दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले आणि आदमपूर तसेच
सिरसा एअरबेसच्या सध्याच्या स्थितीचे फोटो दाखवले – जेथे कोणतेही नुकसान झालेले नव्हते.
मोदींच्या भेटीने खोटे दावे झाले निष्प्रभ
पंतप्रधान मोदींच्या प्रत्यक्ष भेटीने पाकिस्तानचा प्रचार पूर्णतः निष्प्रभ ठरवला आहे.
एकीकडे भारताने “ऑपरेशन सिंदूर”मधून जबरदस्त कारवाई केली,
तर दुसरीकडे पाकिस्तानच्या खोट्या गोष्टींना आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पाडलं.
Read Also : https://ajinkyabharat.com/cbse-barawi-removes-zaheer/