नवी दिल्ली | प्रतिनिधी –
भारत सरकारने देशाच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या ध्वजाखाली चालणाऱ्या कोणत्याही जहाजाला आता भारतीय बंदरांवर प्रवेश देण्यात येणार नाही.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
तसेच, भारतीय ध्वजावाहक जहाजांनाही पाकिस्तानातील कोणत्याही बंदरावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
पोर्ट्स, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून,
या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ आणि काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दोन्ही देशांमधील वाढता तणाव आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
समुद्री धोरणात मोठा बदल
हा निर्णय भारताच्या समुद्री धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे.
या बंदीमुळे भारताच्या समुद्री हद्दीत परकीय धोका रोखण्यास मदत होईल आणि देशाची आर्थिक व व्यापारी सुरक्षाही अधिक मजबूत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काय आहे पुढचा टप्पा?
सरकारने बंदर प्राधिकरणांना या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, सीमा शुल्क, नौदल आणि तटरक्षक दलांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे,
जेणेकरून कोणतीही पाकिस्तान ध्वजावाहक जहाजे भारतीय जलसीमेच्या आत शिरू शकणार नाहीत.
Read Also : https://ajinkyabharat.com/prem-sangabhaye-chidlelya-pityache-rakshasi-roop/