अकोला –
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेचा परिणाम अकोल्याच्या पर्यटकांवरही झाला असून, अकोल्यातील ३१ पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत.
Related News
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात सूर्य आग ओकतंय! अकोला-चंद्रपूर 45 अंशांच्या पुढे; तुमचं शहर किती तापलंय?
अरबी समुद्रात पाकिस्तानची हालचाल, युद्धनौकांवरून क्षेपणास्त्र सराव; भारतीय नौदलही उच्च सज्जतेवर
भारताच्या कठोर निर्णयांनंतर पाकिस्तानचा खवळलेला सूर; युद्धाची भाषा आणि हवाई हद्दीचा बंदी निर्णय
पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा;
केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांची उपस्थिती
पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्याचा पाकिस्तानच्या शेअर बाजारावर परिणाम;
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय;
पोलिसांची वेगवान कारवाई
अकोल्यात विद्युत केबल चोरी करणाऱ्या चोराला अटक
बारामुल्ला येथे घुसखोरीचा प्रयत्न उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान,
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण?
धारगड येथे वयोवृद्ध महिलेस प्राणघातक मारहाण;
हे सर्व पर्यटक १८ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान ‘गुरुमाऊली टूर्स’च्या माध्यमातून काश्मीर दौऱ्यावर गेले होते.
मात्र, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास तात्काळ थांबवला आहे.
स्थानीय नागरिकांनी दिला आधार, पर्यटक सुखरूप
सध्या हे पर्यटक श्रीनगरमध्ये थांबले असून, तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना
सहकार्य व मदत केली असल्यामुळे ते सर्वजण सुखरूप आहेत,
अशी माहिती मिळाली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, हे पर्यटक मिळेल त्या मार्गाने अकोल्यात परत यायला इच्छुक आहेत.
परतीसाठी राज्य सरकारकडे मदतीची मागणी
पर्यटकांनी लवकरात लवकर अकोल्यात परतण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे.
त्यासाठी यंत्रणांनी तात्काळ हालचाली करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chorla-stuck-stolen/