पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर भारताने ठोस कारवाई
करत पाकिस्तान व पीओकेमधील (पाकव्याप्त काश्मीर) दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हवाई हल्ले केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक स्ट्राईक करत त्यांचा खात्मा केला.
Related News
अकोल्यात फटाके फोडून भारतीय सेनेला सलामी
अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
अकोल्यात मुस्लिम बांधवांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष; फटाके फोडून मिठाई वाटली
अकोल्यात शिवसेनेकडून सैनिकांना सलाम, लाडू वाटून जल्लोष
“ही कारवाई थांबू नये…” – ऑपरेशन सिंदूरवर शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांची भावुक प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
या ठोस आणि निर्णायक कारवाईनंतर संपूर्ण देशभरात तसेच राज्यातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक
ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अकोल्यात देखील याचा परिणाम दिसून आला.
अकोल्यातील अग्रेसन चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला.
या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नागरिकांनी “भारत माता की जय”, “पाकिस्तान मुर्दाबाद”,
“जय हिंद, जय सेना” अशा घोषणा देत भारतीय सैन्याच्या धाडसाचे व पराक्रमाचे अभिनंदन केले.
या जल्लोषाद्वारे अकोल्यातील नागरिकांनी दहशतवादाच्या विरोधात
आणि भारतीय सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे निदर्शित केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharitachaya-air-strikentar-chinachi-turkali-pakistanla-restraint/