नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी
खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्यात थेट फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून नेमलेले खासदारांचे हे गट विविध राष्ट्रांना भेट देऊन भारताच्या ऑपरेशन
सिंदूरमधील भूमिकेचे स्पष्टीकरण देणार आहेत. या शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश करण्यात आला असून,
शिवसेनेने या पुढाकाराचे स्वागत करत दहशतवादाविरोधातील लढ्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्र सरकारला दिले आहे.
शिष्टमंडळ हा कोणत्याही राजकीय हेतूने नसून, केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केल्यानंतर,
उद्धव ठाकरे यांनी “आपण देशासाठी आवश्यक ते सहकार्य करू,” असे केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.
शिवसेना (ठाकरे गट) यांची भूमिका स्पष्ट करताना असेही सांगण्यात आले की,
“देशात गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न विचारले जातील,
पण जागतिक स्तरावर पाकिस्तानमधील दहशतवादाचे वास्तव उघड करणे, त्याला एकटे पाडणे आणि नष्ट करणे आवश्यक आहे.”
शिवसेनेने यावेळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या
विषयावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली.
तसेच अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळांबाबत सर्व राजकीय पक्षांना सविस्तर माहिती देण्यात यावी,
अशी सूचना देखील करण्यात आली.
भारत सरकारचा उद्देश —
खासदारांच्या माध्यमातून विविध देशांमध्ये जाऊन भारताच्या दहशतवादाविरोधातील स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडणे,
आणि जागतिक सहमती मिळवून पाकिस्तानस्थित दहशतवादाचा बंदोबस्त करणे हा असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pooja-meshram-yanani-international-level-akolyacha-jhanda-fadkavala/