कोरपणा तालुक्यातील नांदा ग्रामपंचायतीचा गृहकर व पाणीकर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकीत असून अनेक नागरिकांनी सलग तीन, चार, अगदी पाच वर्षांपासूनही कराचा भरणा केलेला नाही. या थकबाकीमुळे ग्रामपंचायतीच्या नियमित आर्थिक कारभारावर मोठा परिणाम होत असून कर्मचाऱ्यांचा पगार, दैनंदिन साफसफाईची कामे यांसारख्या अत्यावश्यक उपक्रमांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सामान्य निधीत पैसे उपलब्ध नसल्याने अनेक आवश्यक कामे प्रलंबित राहिली आहेत.
ग्रामपंचायतीकडून सध्या घरोघरी जाऊन कर वसुलीचा उपक्रम सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करून कराचा भरणा करावा, अशी विनंती ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. गावातील कर वसुली सुरळीत व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी वार्डात जाऊन ग्रामस्थांशी बैठक घेणे आणि कर भरण्याचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक असतानाही या पातळीवर अपेक्षित हालचाल होताना दिसत नाही, अशी ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीतर्फे गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या कडे थकीत असलेले गृहकर व पाणीकर स्वतःहून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून सहकार्य करावे.
Related News
मोठा धक्का! 4 जूनला पुण्यातील 50 हून अधिक भागांचा पाणीपुरवठा पूर्ण बंद; 2 दिवस कमी दाबाने पाणीपुणे, 3 जून: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दैन...
Continue reading
धक्कादायक! खडकवासला कालव्यात बुडून एअर फोर्सच्या 41 वर्षीय सार्जंटचा दुर्दैवी मृत्यूपुण्यातील खडकवासला परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली ...
Continue reading
तुकाराम मुंडेंचा मोठा धडाका! 11 लाखांचे आंबे जप्त; 37 जण अटकेत, 31 दुकाने सीलअन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्व...
Continue reading
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; 3 वाहनांच्या धडकेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 3 गंभीर जखमी
महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या...
Continue reading
महाराष्ट्राच्या महामार्गांवर मृत्यूचे तांडव; एकाच दिवशी 3 भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत
महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर सोमवारी घडलेल्या तीन भीषण रस्ते अपघातांनी संप...
Continue reading
मुंबईवर भीषण जलसंकट! 7 तलावांपैकी एक पूर्ण कोरडा, फक्त 40 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक
मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला पाणीपुरवठा...
Continue reading
मुंबई महापालिकेचा अजब कारभार? बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई; उपमहापौरांची थेट कबुली
मुंबईत अनधिकृत फेरीव...
Continue reading
MU Admission 2026 : दुसऱ्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये तब्बल 9 टक्क्यांपर्यंत घसरणमुंबई, 1 जू...
Continue reading
4 तासांच्या जोरदार माथापच्चीनंतर अखेर निर्णय! पुण्यातून विक्रम काकडे यांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी, जळगावात राजकीय खळबळ
महाराष्ट्र विधान परिषद नि...
Continue reading
पोहरादेवी येथील ‘बणजारा विरासत’ संग्रहालयाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी; विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा
वाशिम, दि. ३० मे : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यां...
Continue reading
पुणे रेल्वे स्थानकातून 1 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण; 65 CCTV तपासून पोलिसांनी उधळला विक्रीचा भयानक कट
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या एका धक्का...
Continue reading
मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला!
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कथित कट उधळण्यात सुरक्षा यंत्...
Continue reading
यासोबतच यशोधन विहारवर असलेली तब्बल १६ लाख रुपयांची थकबाकी सुद्धा ग्रामपंचायतीसमोर मोठी समस्या बनली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यशोधन विहारच्या प्रोपायटर पौर्णिमा श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधून थकबाकीची रक्कम प्रेमाने व नियमांनुसार वसूल करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक शिस्तीसाठी आणि गावाच्या विकासासाठी कर भरणे अत्यावश्यक आहे. नांदाच्या सर्व नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/importance-of-skills-in-ai-era-instagram-ceo-adam-mosseri-said-what-is-necessary-to-be-successful/