मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर
यांनी आणलेल्या महाकुंभच्या गंगाजलवर टीका करत गंगा नदीच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला.
त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्याची टीका होत आहे.
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
मात्र असं असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आज राज ठाकरे यांचं कौतुक केलेलं बघायला मिळालं.
आज माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिमीक्री करत असं बोलायला हिम्मत लागते,
राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली, अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आहे.
मात्र आम्ही असं बोललो असतो तर आत्तापर्यंत यांच्या घरावर दगड आले असते,
आमच्या विरोधात निषेध मोर्चे निघाले असते, आम्ही देशद्रोही सुद्धा ठरलो असतो, असंही आव्हाडांनी म्हंटलं आहे.
भारतात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मी राज ठाकरे यांचं अभिनंदन
करेल की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिम्मत लागते.
आम्ही बोलायला घाबरतो की आपल्या मागे लागतील हे, पण राज ठाकरे बिनधास्त बोलले आहेत,
असं म्हणत त्याच्या डेरिंगला सलाम आहे, असं म्हणत आव्हाडांनी ठाकरेंना सलाम ठोकला.
Read more news here : https://ajinkyabharat.com/aajchaya-earth-sankalpat-shetkari-debt-forwards-announcement-rohit-pawar/