मुंबई, ८ मे २०२५ – महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले
असून नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबईतही दमट हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उष्माघाताचे प्रमाणही वाढत आहे.
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
मान्सूनची चाहूल! राज्यात प्री-मान्सूनची जोरदार हजेरी,
PM Kisan 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी 30 मे पूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेली ताजी अपडेट नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा नैऋत्य मान्सून आठवडाभर लवकर म्हणजेच १ जून रोजी केरळात
दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मान्सून ७ ते ८ जून दरम्यान केरळात येतो,
मात्र यंदा त्याचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत आहेत.
या अंदाजानुसार, महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये १० ते ११ जूनच्या दरम्यान पावसाचा पहिला शिडकावा होण्याची शक्यता आहे.
मान्सून कोकण किनारपट्टीवरून महाराष्ट्रात प्रवेश करत पुढे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विस्तारतो.
हवामान विभागाने सांगितले आहे की, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल.
यंदाचा २०२५ सालचा पावसाळा सामान्यपेक्षा जास्त पावसाचा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानुसार, देशभरात सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडू शकतो. यामुळे जलाशयांमधील साठा वाढेल,
भूजल पातळी उंचावेल आणि शेतीसाठीही हा पाऊस फायदेशीर ठरेल.
Read Also : https://ajinkyabharat.com/indian-senella-virat-kohlicha-salute/