मुंबई, ८ मे २०२५ – महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले
असून नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले आहेत. मुंबईतही दमट हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उष्माघाताचे प्रमाणही वाढत आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेली ताजी अपडेट नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा नैऋत्य मान्सून आठवडाभर लवकर म्हणजेच १ जून रोजी केरळात
दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मान्सून ७ ते ८ जून दरम्यान केरळात येतो,
मात्र यंदा त्याचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत आहेत.
या अंदाजानुसार, महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये १० ते ११ जूनच्या दरम्यान पावसाचा पहिला शिडकावा होण्याची शक्यता आहे.
मान्सून कोकण किनारपट्टीवरून महाराष्ट्रात प्रवेश करत पुढे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विस्तारतो.
हवामान विभागाने सांगितले आहे की, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल.
यंदाचा २०२५ सालचा पावसाळा सामान्यपेक्षा जास्त पावसाचा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानुसार, देशभरात सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडू शकतो. यामुळे जलाशयांमधील साठा वाढेल,
भूजल पातळी उंचावेल आणि शेतीसाठीही हा पाऊस फायदेशीर ठरेल.
Read Also : https://ajinkyabharat.com/indian-senella-virat-kohlicha-salute/