मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
“अजित पवार हे प्रचंड मोठी चूक करत आहेत. ते जातीयवादी लोकांना पोसण्याचे काम करत आहेत.
याचे परिणाम त्यांना लवकरच भोगावे लागतील,” असा थेट इशारा जरंगे पाटलांनी दिला आहे.
“भुजबळांना चॉकलेट दिलंय!”
भुजबळांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी टोला लगावला :
“छगन भुजबळ मंत्री झाला की नाही याचा आम्हाला काही फरक पडत नाही. ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे.
मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भुजबळांना तात्पुरता आनंद दिला गेला आहे.
त्यांना चॉकलेट दिलंय, पण या आनंदावर लवकरच विरजण पडेल.”
“तात्पुरतं नादी लावलंय”
जरांगे पुढे म्हणाले,
“हे सरकार, हे नेते तात्पुरते उपाय करून प्रश्न नादी लावत आहेत. पण आम्ही थांबणार नाही.
आमच्या प्रश्नांना फक्त मंत्रीमंडळ नाही, तर न्याय हवा आहे.“
भुजबळांच्या विरोधात वारंवार आक्रमक
छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाला खुला विरोध करणारे असल्याने मनोज
जरंगे पाटील हे त्यांच्या नेहमीच विरोधात आक्रमक राहिले आहेत.
आज पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या निमित्ताने राजकीय तापमान वाढले असून,
मराठा आंदोलकांच्या भूमिका आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
जरंगे पाटलांच्या या प्रतिक्रियेनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध
ओबीसी वादाचा सूर चढताना दिसतो आहे.
यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/state/