ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती.
Related News
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि पुन्हा अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार डोनाल्ड ट्रम्प
यांनी अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेची (Air Defence System) घोषणा केली आहे.
या यंत्रणेचं ...
Continue reading
नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली आग आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसत आहे.
तब्बल 72 तास उलटल्यानंतरही ही आग पूर्णतः आटोक्यात आलेली नसून,
संपूर्ण परिसरात प...
Continue reading
पुणे (प्रतिनिधी): लग्नात अपेक्षित हुंडा व मानपान न मिळाल्याने विवाहितेचा सासरच्या
मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. या छळाला कंटाळून हडपसर
येथील 22 वर्षीय दीपा उर्फ देवकी...
Continue reading
बच्चन सिंग यांची नागपूर कमांडर म्हणून बदली; आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल
अकोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राज्यभरातील पोलीस अधीक्षकांच्या
...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): काल झालेल्या जोरदार पावसामुळे डाबकी रोड परिसरात
वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाच्या तीव्रतेमुळे रस्ते जलमय झाले असून,
सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया जोमात सुरू झाली आहे.
१९ मेपासून सुरू झाले...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील पातुर, बाळापूर तालुक्यांसह इतर
भागांमध्ये सतत घिरट्या घालणाऱ्या विमानामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): अकोला शहरात गेल्या एक तासापासून प्री-मान्सून पावसाने जोर धरला
असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी रस्त्यांवर जलजमाव झाल्याने वाह...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): अकोल्याच्या अकोट फाईल परिसरातील पूरपीडित इंदिरानगरमध्ये
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात
आल्याची धक्कादायक घटना समोर आली...
Continue reading
अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून अनेक ठिकाणी
आलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. तर आगामी खरीप हंगामाची तयारीही खोळंबली आहे.
अकोल्यातील गोर...
Continue reading
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – पाकिस्तानसाठी जासूसी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात
आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा उर्फ ‘ज्योती राणी’ या प्रकरणात एक नवा खुलासा समो...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी) – लग्नसमारंभ म्हटले की विविध आकर्षक कार्यक्रम,
आधुनिक ट्रेंड्स हे सामान्य झाले असताना अकोल्यात एका विवाहसोहळ्याने सामाजिक व धार्मिक
जाणीवेचा नवा आदर्श निर्माण क...
Continue reading
आतापर्यंत एकूण नऊ हाफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे.
तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे.
मात्र दुसरीकडे काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहील असा दावा महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे.
दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपये नाही तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
याबाबत बोलताना सर्व सोंगं करता येतात परंतु पैशांचं सोंग करता येत नाही.
राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्यवेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली, त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 देणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
विरोधकांनी सुधरावं, आम्ही जे बोललो ते बोललो, काँग्रेसने देखील आश्वासन दिली होती, मात्र त्यांनी ती पाळली नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मात्र तरी देखील 2100 रुपये कधी मिळणार? याकडे आता राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.