लढणार आणि पाडणार! विजय करंजकर निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम

विजय करंजकर

नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली.

मात्र, नाराज झालेल्या विजय करंजकर यांनी आपली नाराजी उघडपणे मांडत लढणार आणि पाडणार अशी भूमिका घेतली.

Related News

विजय करंजकरांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली आहे.

मात्र, काल विजयी करंजकर यांनी हितचिंतकांचा मेळावा घेत उमेदवारी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

तेरा वर्षांपासून जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असताना अनेकांची कामे केली.

त्यामुळे आता पुढील काळात आपण सर्व मला साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून उमेदवारीवर ठाम असल्याची भूमिका विजय करंजकर यांनी घेतली आहे.

त्यामुळे आता विजय करंजकर हे अपक्ष उमेदवारी करणार असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे.

विजय करंजकर यांनी काल सायंकाळी हितचिंतकांचा मेळावा घेतला. यावेळी जवळपास ५००० विजय करंजकर यांचे समर्थक मेळाव्यासाठी उपस्थित होते.

देवळाली येथे विजय करंजकर यांचा हितचिंतक मेळावा पार पडला. या मेळाव्याला जिल्हाभरातून विजयी करंजकर यांच्या हिदाचिंतकांनी हजेरी लावली होती.

त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आव्हान देण्याची भूमिका विजय करंजकर यांनी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे.

हितचिंतक मेळाव्यात विजय करंजकर म्हणाले, राजकारण हा कबड्डीचा खेळ आहे. एक जण एन्ट्री करतो तर सात जण पाय ओढतात.

माझ्याकडे देखील पाच जण मागे ओढायला होते, असे बोलत नाशिक जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या प्रमुख पाच नेत्यांवर विजय करंजकरांनी जोरदार टीका केली.

आधी जीव का जाईना शिवसेना मात्र आता जीव का घेणा शिवसेना अशी भूमिका पक्षात घेतली जात असल्याची खंत करंजकर यांनी व्यक्त केली आहे.

बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून मी पक्षासाठी काम करतोय. अनेक ठिकाणी त्याग केला आहे.

त्यामुळे आता किती संघर्ष करावा लागला तरी करणार, असं देखील विजय करंजकर म्हणाले.

मी जिल्हाप्रमुख असताना अनेकांना एबी फॉर्म दिली आहेत.

विधानसभेसाठी देखील मी एबी फॉर्म दिला, मात्र स्वतःच्या घरातून चहा पिऊन काम केले, कोणाचा एक कप चहाही घेतला नाही.

असे बोलत थेट ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर विजय करत करांनी गंभीर आरोप केले.

माझी निष्ठा मातोश्री सोबत असून ज्याला मी २००८ साली उपजिल्हाप्रमुख केले. तो माझ्यावर भुंकतो.

असे बोलत विजय करंजकरांनी ठाकरे सेनेच्या नेत्यांवर टीका केली.

मला वेळ देऊनही न बोलता माझा अभिमान केला. मी त्यांचा शोध घेत आहे आणि विजय करंजकर ज्यांना टिळा लावतो तो विजयी होतो असे देखील विजय करंजकर यांनी उपरोधिक टोलवाटोलवी केली आहे.

त्यामुळे आता मी नडणार आणि लढणार अशी भूमिका विजय करंजकर यांनी घेतली आहे.

पक्षात मी एकटाच इच्छुक होतो. वाजेंना उमेदवारी दिल्यानंतर वाजे यांचे नाव न घेता ज्यांना उमेदवारी मिळाली.

त्यांनी माझ्या घरी येऊन परस्पर उमेदवारी मिळवल्याची कबुली दिली असती तर माझे मन शांत झाले असते.

असे देखील विजय करंजकर यांनी राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारी संदर्भातील घडामोडींवर बोलताना भाष्य केले आहे.

माझा बाप शेतकरी होता असे बोलत वाजे यांचे आजोबा-आजी हे देखील आमदार होते.

असे बोलत थेट राजाभाऊ वाजे यांच्यावर विजय करंजकरांनी निशाणा लगावला आहे.

त्यामुळे आता मी लढणार आणि पाडणार अशी भूमिका घेऊन विजय करंजकर यांनी उपस्थितांना मी तुमच्यासाठी लढत राहील अशी भूमिका घेतली आहे.

Related News