अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून सुमारे ३०० हून अधिक शेतकरी या मेळाव्यात सहभागी झाले होते.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
खरीपपूर्व नियोजनासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
खरीप हंगाम अगदी जवळ आल्याने शेतकऱ्यांना बियाणे, पीक पद्धती, लागवड तंत्र,
पिकांवरील रोग नियंत्रण अशा अनेक मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शनाची गरज असते.
याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ दरवर्षीप्रमाणे यंदाही मेळाव्याचे आयोजन केले.
शेतकऱ्यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. तांत्रिक मार्गदर्शनासाठी विद्यापीठातील
शास्त्रज्ञांनी विविध विषयांवर सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांचे प्रश्न समाधानपूर्वक सोडवले.
कुलगुरू डॉ. शरद गढाक यांचे मत
“विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करून उत्पादनात वाढ घडवून आणणे.
खरीप हंगामासाठी योग्य नियोजन केल्यास नुकसान टाळता येते आणि नफा वाढवता येतो.“
— डॉ. शरद गढाक, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
शेतकऱ्यांची मागणी : बोंड अळीवर उपाय शोधा
मेळाव्यात शेतकऱ्यांनी बोंड अळीच्या वाढत्या प्रकोपावर चिंता व्यक्त करत,
विद्यापीठाने या कीटकावर प्रभावी बियाण्यांचे संशोधन करावे, अशी मागणी केली.
या मागणीची दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतली असून लवकरच संशोधन सुरू करण्याची तयारी दर्शवली.
उपस्थित शेतकऱ्यांचे समाधान
शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहितीमुळे यंदाच्या खरीप हंगामात नक्कीच फायदा होणार असल्याचे सांगितले.
मेळाव्याचे आयोजन शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या मेळाव्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते शास्त्रशुद्ध ज्ञान आणि
मार्गदर्शन मिळाले, हे विशेष. विदर्भातील अन्य कृषी विद्यापीठांनीही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/lajjasap-chhattisgarh/