विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार
राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे.
तर काही भागांत अद्यापही पावसाची शक्यता कायम आहे.
Related News
Prashant Koratkar : जामीन फेटाळला, सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
MLC पोटनिवडणूक: राष्ट्रवादीत रस्सीखेच, संग्राम कोते vs झीशान सिद्दिकी – कुणाचं पारडं जड?
कसारा येथे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेचा शनिवारी-रविवारी पॉवर ब्लॉक! प्रवाशांनी सावधान!
‘मला चटके देताना एवढंच म्हणायचे…’, गरम सळईचे चटके दिलेल्या तरूणानं सांगितली धक्कादायक आपबीती
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला दणका, विरोधात घेतला मोठा निर्णय
“धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला !”
अकोल्यात जिल्हा काँग्रेसचे शेतकरी कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन
‘रोहित शर्मा जाडा अन् वाईट…’ – वादग्रस्त वक्तव्याने खळबळ!”
मुलीच्या छेडछाडीप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक आरोपी, सध्या शिंदे गटात!”
धनंजय मुंडेंनी आता तरी राजीनामा द्यावा – आमदार क्षीरसागरांचा घणाघात!”
नंदुरबार ब्रेकिंग: जुन्या वादातून मजुराची कुराडीने निर्घृण हत्या!….
त्यातच मुंबईसाठी पुढील २४ तास अत्यंत महत्वाचे असल्याचे
हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
येत्या २४ तासांत कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील
काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात
मुंबईच्या हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाची उघडीप असलेल्या भागात ढगाळ हवामानासह
उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.
पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळिशीपार गेले आहे.
मात्र आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अडखळलेली वाटचाल सुरू होण्यास
पोषक हवामान होत आहे.
त्यामुळेच राज्यात पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
पावसासह जोरदार वारे वाहणार आज हवामान खात्याने पालघर,
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारामध्ये
मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
तर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा,
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वादळी वारे,
विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/34-people-died-after-drinking-poisonous-liquor-in-tamil-nadu/