देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
विशेष म्हणजे, एकट्या मुंबईत ५६ रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
कोरोना संसर्गावर पुन्हा अलर्ट
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची वाढ पाहता, भारतातही केंद्र सरकारने कोरोना अलर्ट जारी केला आहे.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना RT-PCR टेस्टिंग वाढवण्याचे, हॉस्पिटल्समध्ये तयारी
ठेवण्याचे आणि लसीकरणाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासन सज्ज, खबरदारीचे उपाय सुरू
आरोग्य यंत्रणांनी खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला असून,
नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
➡️ मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासन सतर्क
➡️ देशभरात प्रतिबंधात्मक उपाय सुरू, टेस्टिंग वाढवण्याचे आदेश
➡️ सामान्य नागरिकांनी गर्दी टाळावी, मास्क वापरावा आणि आरोग्य तपासणीसाठी पुढे यावं
कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला असून,
नागरिकांनीही जबाबदारीने वागणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sonyachaya-darat-punha-vadha/