मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आज महत्वाची बैठक
बोलवली आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी विद्यामान सरकार आणि भाजप
नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ले केले. ते म्हणाले,
Related News
उंबर्डा बाजार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर
अकोला : आदिवासी हक्कांसाठी ‘बिरसा क्रांती दल’चं धरणे आंदोलन, निधी व सर्टिफिकेट घोटाळ्याच्या विरोधात आवाज
हिरपूर ग्रामपंचायतीची उदासीनता;नाल्यांचे उपसण न झाल्याने ग्रामस्थ संतप्त
अकोला : दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा ZP सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
अकोला : मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाच्या ई-बाईकला अचानक आग; जीवितहानी टळली
इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत
बोर्डी घरकुल योजनेच्या बांधकामाचा चौकशी अहवाल सादर
संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
आम्हाला संपवण्यास निघालेला आम्ही संपवणार म्हणजे संपवणार
आहे. मग त्यासाठी कोणतीही प्रक्रिया असो. आमची सामाजिक,
शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे.
बदलाच घेणारच आहोत. आमचे सुख या सरकारला पाहता आले
नाही. हा आनंद हिरवून घेणाऱ्यास आता सोडणार नाही. आमच्या
हाततोंडाला आलेला घास काढला. आमचा हातही छटला आणि
घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण
काढून घेतले, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. सरकार अन् देवेंद्र फडणवीस
यांना काहीच अधिकार नसताना त्यांनी आमचे बळी घेतले. शेवटी जातात
जातात आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात
घातल्या. परंतु मराठ्यांना काही दिले नाही. मराठ्यांचे मुले मोठे होऊ
नये, या भूमिकेतून ते उतरले. आता त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही
सोडणार नाही. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल ती करु. आमचा
समाजाला इतके टार्गेट करण्याची गरज नव्हती. सरकारने आमच्या
समाजाची मने दुखवली आहे. सरकारने सूडबुद्धीने वार करत आरक्षण
हिरावून घेतले आहे. त्यांनी जाती जातीत खून्नस लावून दिली. ते अत्यंत क्रूर
आहेत. जातीत जातीत त्यांनी विष पेरले आहे. आता त्यांचा पडाव मराठा
लोकच करणार आहे. लोकांना आता राजकीय लोक नाही. त्यांच्याशी
आम्हाला काही घेणे देणे नाही. आम्ही आमच्या मुलांचे भविष्य पाहू.
मराठा समाजाने काय पाप केले? तुम्ही त्यांना ७० वर्षांपासून आरक्षण
देत नाही. ते लोक खूप खुन्नस करत आहे. त्यांच्या पक्षातील मराठा समाजातील
नेत्यांशी ते खुन्नस करत आहे. इतके मुळावर उठण्याची काहीच गरज नव्हती,
असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत
आज अंतरवाली सराटी मध्ये महत्वाची बैठक होत आहे. विधानसभा निवडणुकीत
कोणाला निवडून आणायचे किंवा कुणाला पडायचे की, स्वतःचे उमेदवार उभे
करायचे हा निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/thackeray-gatachaya-shiv-sena-paksala-reformed-torch-election-symbol/