अकोट तालुक्यातील भंडाराज (ता. अंजनगाव सुर्जी) येथे होली क्रॉस दवाखान्याजवळील छोट्या पुलाजवळील धोकादायक वळणावर बुधवारी मोठा अपघात झाला. मारुती सुझुकी स्विफ्ट (MH 27 BE 8081) आणि एसटी बस (MS 20 GC 3932) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली, ज्यात ६५ वर्षीय शालिकराम रामचंद्र वानरे (रा. आकोट) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कुसुम वानरे (६५) आणि रखमाबाई शालिग्राम गवई (८०) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अचलपूर येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. तसेच विमल रमेश पिंपळकर (५५), वंदना निलेश पिंपळकर (३५), रमेश रामचंद्र पिंपळकर (७२), उत्कर्ष कडू वानरे (नववधू) आणि प्रथमेश वानरे (३०, नवविवाहित) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, अपघाताचे मुख्य कारण रस्त्यावर पडलेला मोठा गड्डा आणि वळणातील दबलेली रस्ता असल्याचे सांगितले जाते. वाहनाचा नियंत्रण सुटल्यामुळे स्विफ्ट बसला समोरासमोर धडकली. अपघाताच्या जागी तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची तातडीची मागणी केली आहे.
Related News
सदर कुटुंब मुरा देवी (ता. अंजनगाव सुर्जी) येथे देवदर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. नवविवाहित दाम्पत्याच्या प्रवासात आलेल्या या अपघाताने दोन्ही कुटुंबांमध्ये हळहळ पसरली आहे. स्थानिकांनी अपुरी सुरक्षा व्यवस्था, इशारा फलकांचा अभाव आणि वेगमर्यादा दर्शविणाऱ्या चिन्हांची कमतरता यावर चिंता व्यक्त केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/mla-balasaheb-mangulkar-gave-sacks-to-ministers-for-the-welfare-of-workers/
