पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली
असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे.
याबाबत श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले.
Related News
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड…
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले की, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांसाठी सरकारने अनुदानाचे आश्वासन दिले होते.
मात्र, संबंधित अधिकारी अनुदान देण्यास उशीर करत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १५ जानेवारी २०२५ पर्यंत अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.
जर दिलेल्या मुदतीत देयक देण्यात आले नाही, तर २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय,
अकोला येथे आमरण उपोषण (अन्नत्याग) आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी रवी दिगांबर सोनोने, शुभम राखोंडे, मोहन गाडगे,
मुस्ताईन बेग, संदिप टाले, भगवंत काळदाते, कैलासचंद्र पराते आदी शेतकरी यांच्या निवेदनात सह्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/