भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील
अशोक वटीकेत उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह
स्थानिक नागरिक आणि भीम अनुयायांनी मानवंदना दिली.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
या प्रसंगी मोठ्या उत्साहात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अशोक वटीकेत आयोजित या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली.
यावेळी बुद्ध वंदना, संविधान वाचन, आणि शौर्य गीते यांसारख्या कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले.
विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून, भीम अनुयायांनी वीर शिलेदारांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमादरम्यान बौद्ध विचारसरणीवर आधारित भाषणे, शैक्षणिक उपक्रमांचे उद्घाटन, आणि सामूहिक भोजन
यांसारख्या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला.
अनेक स्थानिक कलाकारांनी गीत-संगीत व नृत्य सादर करून कार्यक्रमाला चार चांद लावले.
या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली.
त्यांनी बौद्ध समाजाला मिळालेल्या प्रेरणादायी वारशाचे महत्व अधोरेखित केले
आणि सामाजिक समतेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
अशोक वटीकेत उभारलेला विजयस्तंभ हा भीमा कोरेगावला जाऊ न शकणाऱ्या अनुयायांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
बौद्ध संघर्ष समितीने या स्तंभाच्या उभारणीसाठी घेतलेला पुढाकार समाजासाठी अभिमानास्पद ठरला आहे.
कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थितांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि
भीमा कोरेगावच्या वीरांना मानवंदना दिली आणि नव्या वर्षासाठी सामाजिक एकतेचे संकल्प घेतले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/reading-sankalp-maharashtracha-or-undertaking-shankarlal-khandelwal-mahavidyalaya-inauguration-completed/