युजवेंद्र चहलच्या पोस्टने चर्चांना उधाण! घटस्फोटाच्या अफवांदरम्यान देवाचे मानले आभार
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या पत्नी धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे.
अद्याप दोघांपैकी कोणीही अधिकृत वक्तव्य केलेले नसले, तरी सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आले आहे.
Related News
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
त्यातच चहलने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे देवाचे आभार मानत एक गूढ पोस्ट शेअर केली आहे.
चहलची गूढ पोस्ट – नेमकं काय लिहिलं?
चहलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत लिहिलं –
“मी जितकं पाहू शकतो, तितक्या वेळा देवानं माझं नेहमीच रक्षण केलं आहे.
त्यामुळे मी त्या वेळेची केवळ कल्पनाच करू शकतो, ज्यावेळी मला वाचवण्यात आलं,
ज्याबाबत मला माहीतच नव्हतं. माझ्यासोबत नेहमी राहण्यासाठी देवाचे आभार, तेव्हाही मला याबाबत काहीच माहीत नव्हतं.”
ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
अनेकांनी या पोस्टचा संबंध त्याच्या वैवाहिक आयुष्याशी लावला आहे.
चहल-धनश्रीमध्ये दुरावा?
गेल्या काही दिवसांपासून चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याने घटस्फोटाच्या अफवा अधिकच वाढल्या.
सोशल मीडियावर चहलच्या चाहत्यांनी दावा केला आहे की, घटस्फोटाच्या स्थितीत चहलला तब्बल
60 कोटींची पोटगी द्यावी लागू शकते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चहलची क्रिकेट कारकीर्द
युजवेंद्र चहलने 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
आपल्या शानदार फिरकीने त्याने वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
- वनडे: 72 सामन्यांत 121 विकेट्स
- टी-20: 80 सामन्यांत 96 विकेट्स
एकेकाळी तो टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.
मात्र, सध्या तो टीम इंडियाच्या बाहेर आहे.
चहलच्या या पोस्टनंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक अंदाज लावले जात आहेत.
पुढे तो किंवा धनश्री यांच्याकडून अधिकृत वक्तव्य केलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Click here for more updates :https://ajinkyabharat.com/rohitchi-lan/