युजवेंद्र चहलच्या पोस्टने चर्चांना उधाण! घटस्फोटाच्या अफवांदरम्यान देवाचे मानले आभार
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या पत्नी धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे.
अद्याप दोघांपैकी कोणीही अधिकृत वक्तव्य केलेले नसले, तरी सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आले आहे.
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
त्यातच चहलने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे देवाचे आभार मानत एक गूढ पोस्ट शेअर केली आहे.
चहलची गूढ पोस्ट – नेमकं काय लिहिलं?
चहलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत लिहिलं –
“मी जितकं पाहू शकतो, तितक्या वेळा देवानं माझं नेहमीच रक्षण केलं आहे.
त्यामुळे मी त्या वेळेची केवळ कल्पनाच करू शकतो, ज्यावेळी मला वाचवण्यात आलं,
ज्याबाबत मला माहीतच नव्हतं. माझ्यासोबत नेहमी राहण्यासाठी देवाचे आभार, तेव्हाही मला याबाबत काहीच माहीत नव्हतं.”
ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
अनेकांनी या पोस्टचा संबंध त्याच्या वैवाहिक आयुष्याशी लावला आहे.
चहल-धनश्रीमध्ये दुरावा?
गेल्या काही दिवसांपासून चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याने घटस्फोटाच्या अफवा अधिकच वाढल्या.
सोशल मीडियावर चहलच्या चाहत्यांनी दावा केला आहे की, घटस्फोटाच्या स्थितीत चहलला तब्बल
60 कोटींची पोटगी द्यावी लागू शकते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चहलची क्रिकेट कारकीर्द
युजवेंद्र चहलने 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
आपल्या शानदार फिरकीने त्याने वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
- वनडे: 72 सामन्यांत 121 विकेट्स
- टी-20: 80 सामन्यांत 96 विकेट्स
एकेकाळी तो टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.
मात्र, सध्या तो टीम इंडियाच्या बाहेर आहे.
चहलच्या या पोस्टनंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक अंदाज लावले जात आहेत.
पुढे तो किंवा धनश्री यांच्याकडून अधिकृत वक्तव्य केलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Click here for more updates :https://ajinkyabharat.com/rohitchi-lan/