अकोला | प्रतिनिधी
अकोला शहरातील गांधी रोड परिसरात सुरू असलेली आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही
सुरू राहिल्याने शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सराफा दुकानांवर सुरू
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
असलेल्या या तपासणीमुळे केवळ संबंधित व्यापारीच नव्हे तर संपूर्ण सराफा बाजारात चिंता पसरली आहे.
सकाळपासूनच दुकानांपुढे आयकर विभागाची वाहने
बुधवारपासून सुरू झालेल्या कारवाईदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची वाहने
सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सराफा दुकानांपुढे उभ्या असल्याचे दृश्य नागरिकांनी पाहिले.
त्यामुळे परिसरात एकच चर्चा रंगली – “कारवाईचा आघात नेमका कोणावर झाला?”
व्यवहारांची कसून तपासणी
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर अधिकाऱ्यांनी दुकानांतील खरेदी-विक्री व्यवहार, आर्थिक नोंदी,
रोख रकमेची देवाणघेवाण व बिलांची सखोल छाननी केली. काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केल्याचेही समजते.
नागपूर विभागाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई आयकर विभागाच्या नागपूर परिक्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.
अनिश्चितता कायम, अधिकृत माहितीची प्रतीक्षा
या कारवाईबाबत अधिकृत प्रेस नोट अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे कारवाई कोणत्या पातळीवर सुरू आहे,
ती किती काळ सुरू राहणार आणि कुणावर नेमकी कारवाई झाली आहे, याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
इतर व्यवसायिकांमध्ये भीतीचं वातावरण
सराफा बाजारात यामुळे इतर व्यापाऱ्यांमध्येही अस्वस्थता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
काही व्यवसायिकांनी सांगितलं की, “कायदेशीर व्यवहार असूनही अशा कारवाया झाल्याने तणाव वाढतो.”
Read Also : https://ajinkyabharat.com/dronechya-najretoon-operation-clean/