नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत यात्रेच्या पूर्वतयारींना वेग आला असून,
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
लवकरच भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार आहे.
ही यात्रा पुन्हा सुरू होणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात
ऑक्टोबर 2024 मध्ये कझान येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीचे फलित मानले जात आहे.
या चर्चेदरम्यान लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक या संवेदनशील भागांमध्ये डिसएंगेजमेंट (सैन्य माघार) करण्यावर सहमती झाली होती.
नवीन मार्गांचा विचार – लिपुलेख आणि डेमचोक दोन्हीही पर्याय खुले
भारत-चीन संयुक्तपणे कैलास-मानसरोवर यात्रेसाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गांबाबत पुनर्विचार करत आहेत.
पारंपरिक लिपुलेख मार्गासोबतच डेमचोक मार्गालाही पर्याय म्हणून विचारात घेतले जात आहे.
नव्या मार्गामुळे यात्रेकरूंसाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
75 वर्षांच्या कूटनीतिक संबंधांचे औचित्य
ही यात्रा 2025 मध्ये भारत-चीन कूटनीतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू होत आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या निमित्ताने दोन्ही देश अनेक सांस्कृतिक आणि राजनैतिक उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहेत.
मार्च 2025 मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यात्रेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
याशिवाय, हा मुद्दा 2024 मध्ये रिओ येथे पार पडलेल्या G-20
परिषदेच्या आणि 2025 च्या जानेवारी महिन्यातील द्विपक्षीय चर्चेच्या दरम्यानही उपस्थित करण्यात आला होता.
Read Also : https://ajinkyabharat.com/chandannagarmadhyay-taruncha-nirghran-khoon/