अकोला :
अकोला शहरातील सीताबाई कला महाविद्यालयातील पिंक मतदान केंद्र क्रमांक १२ वर आज मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन सुमारे दहा मिनिटे बंद पडल्याची घटना घडली. रूम क्रमांक तीनमध्ये असलेल्या या मशीनवर दोन मतदारांनी मतदान केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही काळ तात्काळ थांबावे लागले.
घटनेची माहिती मिळताच निवडणूक कर्मचारी आणि तांत्रिक पथकाने मशीनची तपासणी केली. सुमारे दहा मिनिटांच्या तपासणीनंतर ईव्हीएम पूर्ववत सुरू करण्यात आली आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. मात्र या प्रकारामुळे काही काळ मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान, संबंधित मतदान रूमवर स्पष्ट क्रमांक लावण्यात न आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे मतदान प्रतिनिधी निलेश अरखराव यांनी केला आहे. अशा त्रुटींमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Related News
Big Shock! NCP Rebellion 2026: Baramati Election आधी 35 जणांचे धक्कादायक राजीनामे
Navnath Ban criticized Opposition: भडक आरोप, तुफान हल्लाबोल आणि राजकीय वाद – 10 मोठे खुलासे
वारखेड परिसरात वाघाचा वाढता धोका: मानवी वस्तीत घुसून गाढवाची शिकार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अरविंद सावंत यांची मातोश्री भेट, ‘ऑपरेशन टायगर’वर स्पष्टीकरण, माध्यमांवर टीका आणि निधी वाटपावर सवाल
अकोला धक्कादायक घटना: एमआयडीसी परिसरात तरुणाची चाकूने हत्या, परिसरात भीतीचे वातावरण
अकोला शहरात अल्पवयीनांकडून चाकू हल्ला; दोन आरोपी ताब्यात, तिघांचा शोध सुरू..
Akola News : अकोल्यात 3500 स्क्वेअर फूट भव्य रांगोळी; 16 तासांत साकारलं सम्राट अशोकांचं ऐतिहासिक चित्र
Akola News : धक्कादायक! गॅस एजन्सीसमोर रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू; उष्णतेचा बळी की व्यवस्थेचा बळी?
अकोट : चंडिकापूरमध्ये नाली व पेव्हर ब्लॉक कामात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशीची मागणी
“‘काय पाहतोस?’ म्हणत सुरू झाला वाद… अकोल्यात चहाच्या टपरीवर 17 वर्षीय मुलाचा खून ; पोलिसांची 6 तासांत अचूक कारवाई!”
Akola Crime News : अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ, मलकापूर परिसर दरोडेखोरांच्या टार्गेटवर; सतर्क नागरिकामुळे मोठी चोरी टळली
कल्याणमध्ये ठाकरे गटाचा ‘सेल्फ गोल’? नगरसेवक मधुर म्हात्रे प्रकरणावरून पक्षातच संभ्रम
निवडणूक प्रशासनाने मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करत, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचा दावा केला आहे.
“पिंक मतदान केंद्रात ईव्हीएम अचानक बंद पडली, त्यामुळे मतदारांना थांबावे लागले. शिवाय संबंधित रूमवर क्रमांक लावलेला नव्हता, यामुळे गोंधळ निर्माण झाला. अशा निष्काळजीपणामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.”
