रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापचे आमदार जयंतभाई पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली होती या टीकेला आता सुनील तटकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हाला शिकवू नका, असे खडेबोल सुनावले. तसेच, तुम्ही आत्मपरीक्षण करा तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात यावर विचार न करता माझ्यावर टीका का करता, असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला. महायुतीच्यावतीने कोळी समाज महासंघाचा भव्य मेळावा रायगड जिल्हयात रेवदंडा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी तटकरे बोलत होते.
अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात आणल्याचेही यावेळी त्यांनी बोलून दाखवलं. जयंत पाटील कालच शरद पवारसाहेबांना घेऊन मोर्बा या गावी आले होते. परंतु त्या सभेला जिल्ह्यातील लोक आणूनही गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्त रेवदंडा मच्छीमार, कोळी बांधवांनी केली अशा शब्दात तटकरे यांनी जयंत पाटील यांचा समाचार घेतला.
माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला, येणार्या संकटांना सामोरे जातो; याच कष्टकरी समाजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला येणार्या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझ्या याच मच्छीमार बांधवांकडून मच्छीमारी व्यवसायातून देशाला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले त्याबद्दल कोळी समाज महासंघाच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्त केली.
Related News
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
नाशिकच्या तथाकथित गॉडमन Ashok Kharat आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 17 कॉल? सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप; कॉल डिटेल रेकॉर्डवरून खळबळ
महाराष्ट्राच्या ...
Continue reading
अजित पवारांच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजवरून उठलेल्या शंका; सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण राजकीय विश्व हाद...
Continue reading
सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी होणार; अशोक खरात प्रकरणावर फडणवीसांची मोठी घोषणा
अशोक खरात प्रकरण सध्या राज्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक...
Continue reading
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये देशभरातील टेनिस क्रिकेटपटूंना एकत्र आणणाऱ्या ‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया 2026’ या भव्य क्रिके...
Continue reading
भोंदू बाबा प्रकरणात दीपक केसरकरांची मोठी प्रतिक्रिया; “खरातशी ओळख म्हणजे गुन्ह्यात सहभागी होणे नाही” — गंभीर इशारा देत राऊतांचं नाव घेतलं!
नाशिकच्या कुख्यात
Continue reading
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) शहरातील 65 बेकायदा इमारतींच्या प्रकरणामुळे सत्तारुढ पक्ष भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पुन्हा उग्र झाल्याचे समोर आले आहे. या इमारतींच्या रहि...
Continue reading
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांचा Donald Trump यांना थेट फोन; भारताची भूमिका स्पष्ट
अमेरिका आणि इराण यांच्या...
Continue reading
LPG सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस मिळणार? सरकारचे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास ठेवू नका
देशभरात गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरत होती की, घरगुती LPG
Continue reading
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत राजकीय वाद आता ताजेतवाने चर्चेचा विषय बनला आहे. Satara ZP Election 2026 मध्ये भाजपन...
Continue reading
रायगड: रायगड जिल्ह्यातील घोसाळे किल्ल्याच्या परिसरात शेतकरी ऋषिकेश म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रे यांनी शेतीत एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे. पारं...
Continue reading
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची सक्रिय भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना थेट फोन
पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभू...
Continue reading
माझ्या मच्छीमार बांधवांचा डिझेलचा परतावा यापुढे कधी थकीत राहणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी केंद्रात खासदार म्हणून गेल्यानंतर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील, असं आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
या मतदारसंघात ४ जूनला घड्याळ्याचा गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल, असे सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घड्याळ या चिन्हासमोरील बटण तुम्हाला दाबायचे आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्यात या भागाचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.