रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापचे आमदार जयंतभाई पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली होती या टीकेला आता सुनील तटकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हाला शिकवू नका, असे खडेबोल सुनावले. तसेच, तुम्ही आत्मपरीक्षण करा तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात यावर विचार न करता माझ्यावर टीका का करता, असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला. महायुतीच्यावतीने कोळी समाज महासंघाचा भव्य मेळावा रायगड जिल्हयात रेवदंडा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी तटकरे बोलत होते.
अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात आणल्याचेही यावेळी त्यांनी बोलून दाखवलं. जयंत पाटील कालच शरद पवारसाहेबांना घेऊन मोर्बा या गावी आले होते. परंतु त्या सभेला जिल्ह्यातील लोक आणूनही गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्त रेवदंडा मच्छीमार, कोळी बांधवांनी केली अशा शब्दात तटकरे यांनी जयंत पाटील यांचा समाचार घेतला.
माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला, येणार्या संकटांना सामोरे जातो; याच कष्टकरी समाजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला येणार्या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझ्या याच मच्छीमार बांधवांकडून मच्छीमारी व्यवसायातून देशाला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले त्याबद्दल कोळी समाज महासंघाच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्त केली.
Related News
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची
धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता
मंत्रालयातील मुख्यम...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे
नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.
ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे.
इस्लामाबाद: पाक...
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांनी डिजिटल सेवा कर लादणाऱ्या देशांमधून
आयात केलेल्या वस्तूंवर टॅक्स (शुल्क) लावण्याचे आदेश दिले आहेत,
ज्याचा परिणाम भारतावरही होईल.
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्...
Continue reading
मुख्यमंत्री वैद्यकीय साह्य निधी कक्षाच्या कार्यानंतर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरजू रुग्णांसाठी
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आहे.
या माध्यमातून राज्याती...
Continue reading
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला सामंत बंधूंचा नकार होता.
त्यांना राजन साळवी नको होते. तरी शिंदेंनी साळवींना सेनेत घेतलं,
असा दावा विनायक राऊतांनी केला आहे
प्रसाद रानडे, रत्नागि...
Continue reading
संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.
आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत,
ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत.
दुसरं काही नाही. आमच्या हातात फक्...
Continue reading
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली महत्त्वाची
ऑफर भारताने नाकारली आहे. पीएम मोदी यांच्या अमेरिका भेटी दरम्यान भारत
आणि चीन प्रश्नावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्य...
Continue reading
"थुंका ना मग. जनता तुमच्यावर थुंकली म्हणून तुम्ही लोकसभेला वाहून गेलात.
विधानसभेला पाप करुन निवडून आलात. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना शिव्या घालतात.
तुमचा पक्ष मोठा नसून छोटा आहे. ...
Continue reading
काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी कुंभ मेळ्याच्या आयोजनाबाबत एक बैठक घेतली होती.
या बैठकीला मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते.
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंहस्थ कुंभ मेळ्यासंद...
Continue reading
माझ्या मच्छीमार बांधवांचा डिझेलचा परतावा यापुढे कधी थकीत राहणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी केंद्रात खासदार म्हणून गेल्यानंतर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील, असं आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
या मतदारसंघात ४ जूनला घड्याळ्याचा गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल, असे सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घड्याळ या चिन्हासमोरील बटण तुम्हाला दाबायचे आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्यात या भागाचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.