लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाला समोरं जावं लागल्यानंतर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं सावध पवित्रा घेतला आहे.
Related News
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...
Continue reading
छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.
संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्...
Continue reading
या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
मुंबई:
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता 27 मा...
Continue reading
मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडू...
Continue reading
Donald Trump : दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकी काँग्रेसला संबोधित करत आहेत. राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं हे पहिलं संबोधन आहे...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर
अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.
आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या न...
Continue reading
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी...
Continue reading
Shama Mohamed on Rohit Sharma Is Fat : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Shama Mohamed on Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित श...
Continue reading
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता.
यातील आरोपी भाजपचा माजी नगरसेवक असून तो सध्या शिवसेना शिंदे गट...
Continue reading
Sandeep Kshirsagar : आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा.
असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार घणाघात केला आहे.
Sand...
Continue reading
जुन्या घटनेचा वाद टोकाला कुराडीने एक घाव दोन तुकडे.....
मजुराचा हत्येचा घटनेने हादरला सातपुडा....
धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्गुणपणे मजुराची हत्या....
फाड्या...
Continue reading
सौर ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार आहेत
सर्व शेतीचे फीडर सौर वर परावर्तित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे
२ लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ...
Continue reading
कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी
महायुतीनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली.
विशेष करुन महिला वोट बँकवर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केलं आहे.
मध्य प्रदेशच्या लाडली बहन धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा
समाजातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना
राबवण्याच्या हालचालींना वेग आला.
आगामी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात
या योजनेची घोषणा करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे, माहिती सूत्रांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीनं कंबर कसली आहे.
विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना
समाजातील आर्थिक, दुर्बल घटकांकडं प्राधान्यानं लक्ष दिलं जात आहे.
तसेच या गरीब समाजातील महिलांना आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याच्या प्रयत्नात सरकार आहे.
समाजातील गरीब, निराधार, विधवा महिलांना या योजनेअंतर्गत
दर महिन्याला १२०० ते १५०० रुपये दिले जाणार आहेत.
ही योजना अंमलात आणल्यास सरकारच्या तिजोरीवर वर्षाला
१५ ते २० हजार कोटींचा आर्थिक भर पडू शकतो.
मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान
यांनी मुख्यमंत्री लाडली बहना ही योजना त्यांच्या काळात सुरू केली.
या योजनेचा चौहान सरकारला इतका फायदा की त्यांनी पुन्हा तिथं सत्ता काबीज केली.
इतकंच नाही, तर आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत
मध्यप्रदेशमध्ये भाजपानं लोकसभेच्या २९ पैकी २९ जागा काबीज केल्या.
त्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही योजना महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
या योजनेची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातून अधिकाऱ्यांचं पथक अलीकडंच मध्यप्रदेशला जाऊन आलं.
या पथकानं मध्यप्रदेशमधील मुख्यमंत्री लाडली बहना या योजनेचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी आराखडा तयार करण्यात आला.
२७ जूनपासून सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात
या योजनेची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समाजातील आर्थिक, दुर्बल घटकातील महिलांसाठी ही योजना महत्त्वाची असणार आहे.
या योजनेमुळे महिला स्वतः आत्मनिर्भर होणार आहेत.
दारिद्र्य रेषेखालील २१ ते ६० वर्ष वयोगटातील ९० ते ९५ लाख महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/there-is-no-unanimity-for-the-post-of-lok-sabha-speaker/