अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Related News
‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’; अजित पवार गटात नेमकी ती महिला कोण?
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आसामचे ‘हे’ 5 पारंपरिक पदार्थ, उष्णतेपासून मिळेल आराम
‘Karuppu’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 20 कोटींचा टप्पा पार
Cafe मधील कोल्ड कॉफी इतकी क्रीमी का लागते? जाणून घ्या सीक्रेट ट्रिक्स
उन्हाळ्यात फरमेंटेड भात का ठरतो सुपरफूड? जाणून घ्या जबरदस्त फायदे
शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती
सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सीसीआयकडून (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी बंद
असल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प दरात कापूस विकावा लागत आहे.
तसेच सोयाबीनला अवघा 4000 रुपयांपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मुख्य मागण्या
- महायुती सरकारने आश्वासित केलेली शेतकरी कर्जमाफी तात्काळ लागू करावी
- भावांतर योजना त्वरित अमलात आणावी
- कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांची शासकीय खरेदी सुरू करावी
या मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून,
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Read more here : https://ajinkyabharat.com/bu-azmi-video-abu-azhmi-yanchaya-decorated-vidhanam-ufanar-c/
