[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
  • No categories
  • No categories
शाळेवरून जाणाऱ्या थ्री-फेज वायरमुळे अपघाताचा धोका;

शाळेवरून जाणाऱ्या थ्री-फेज वायरमुळे अपघाताचा धोका;

हिवरखेड | प्रतिनिधी हिवरखेड येथील वरिष्ठ उर्दू प्राथमिक शाळेच्या टिनपत्री छताजवळून जाणारी थ्री-फेज वीजवाहिनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकते. शाळा प्रशासनाने व ग...

Continue reading

वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

बुद्धगया आंदोलनासाठी अकोल्यातून विशेष रेल्वे गाडी सोडावी – वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

अकोला | प्रतिनिधी महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी बुद्धगया येथे १६ व १७ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी अकोला जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत...

Continue reading

परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडली; मनसेच्या हस्तक्षेपामुळे स्थानिकांना मिळाला न्याय व रोजगार

मनसेच्या हस्तक्षेपामुळे स्थानिकांना मिळाला न्याय व रोजगार

अकोला | प्रतिनिधी अकोला औद्योगिक क्षेत्रातील ADM अ‍ॅग्रो कंपनीच्या सुरक्षिततेसंदर्भातील कामगार प्रश्नावर गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्...

Continue reading

“रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा”

“रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा”

प्रासंगिक लेख:- ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन "सरकारी दवाखाण्यात मोफत उपचार पण खासगी रुग्णालयातील दरपत्रकच काय?" “मानवाला मिळालेला देह ही ईश्वराची देणगी आहे. अर्थात त्याचा उप...

Continue reading

पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु

पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु

प्रारंभ आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते पातूर | तालुका प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ पातूर शहर व तालुक्यात नुकताच मोठ्या उत्साहात झाला....

Continue reading

पातुर : शाहबाबू उर्सनिमित्त कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन

पातुर : शाहबाबू उर्सनिमित्त कव्वाली कार्यक्रमांचे आयोजन

पातुर तालुका प्रतीनिधी हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ उर्फ शाहबाबु ( र अ ) यांच्या ७९९ उर्स शरीफ दर वर्षी प्रमाणे साजरा करणयात रेत आहे. त्या निमित्त कव्वाली कार्यक्रम चे आयोजन हाजी ...

Continue reading

" मौन रात्रीचा संवाद मनाशी "....

” मौन रात्रीचा संवाद मनाशी “….

मौनात गुंतलेले शब्द अनोळखीसे वाटतात, डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या आठवणींनी हळवतात, दिवसाने नाकारलेली भावना रात्री ओंजळीत घेते, आणि प्रत्येक अश्रूत ती एक सखी होऊन बसते .… ...

Continue reading

अकोट : पोपटखेड शेतशिवारातील बंद कारखान्यात व्यावसायिकाचा खून

अकोट : पोपटखेड शेतशिवारातील बंद कारखान्यात व्यावसायिकाचा खून

आकोल्यातील व्यावसायिक रमन चांडक यांचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ अकोट | प्रतिनिधी अकोट-पोपटखेड मार्गावरील पोपटखेड शेतशिवारात असलेल्या बंद आणि पडलेल्या बोन कारखान्याच्या इमारतीत ...

Continue reading

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार

रेल्वे स्टेशन चौक परिसरातील धक्कादायक घटना; आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू** अकोला | प्रतिनिधी : गणेश सुरेश नावकार, सहा. पो.नि. अकोला शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरात आपल्या मैत्र...

Continue reading

कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त** अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यालयीन वेळेत अनेक विभागांतील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कक्षात गैरहजर असल्याचे सोमवारी (ता. ७) पाहायला मिळाले. या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. ग्रामविकासाच्या योजनांवर परिणाम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचलाऊ व निष्काळजी भूमिकेमुळे अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी अडथळ्यांमध्ये सापडली आहे. सीईओ बदलीनंतर पुन्हा शिथिलता माजी सीईओ बी. वैष्णवी यांनी अचानक भेट देऊन अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र त्यांची अलीकडेच नागपूर महापालिकेत बदली झाल्यापासून, अनेक 'दांडीबहाद्दर' कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. 'टपरी'चे कर्मचारी! काही कर्मचारी बायोमेट्रिक हजेरीनंतर कार्यालयात थांबतच नाहीत, तर जिल्हा परिषद आवारात भटकंती करताना, चहा टपरी, पानपट्टीवर थांबलेले दिसतात. त्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. साहेब गेलेत, थोड्याच वेळात येतील… गैरहजर कर्मचाऱ्यांविषयी विचारल्यावर "साहेब आत्ताच बाहेर गेलेत", "जिल्हाधिकारी कार्यालयात काम आहे", अशा बनवाबनवी कारणांची सरबत्ती केली जाते. त्यांचे सहकारीदेखील बेशिस्त वागणुकीवर पांघरूण घालतात. विजेचा देखील अपव्यय कार्यालय रिकामे असताना लाईट्स व पंखे सुरू ठेवून विजेचा अपव्यय होत असल्याचेही पाहायला मिळाले. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे झाले आहे. नागरिकांमध्ये संताप सरकारी कार्यालयात वेळेवर काम न झाल्याने सामान्य जनतेला मानसिक त्रास सहन करावा लागत असून, अशा बेजबाबदार कारभारामुळे जिल्हा परिषद प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

जिल्हा परिषदेचा कारभार रामभरोसेच!

कार्यालयीन वेळेत अधिकारी-कर्मचारी गायब; नागरिक त्रस्त** अकोला | प्रतिनिधी : श्रीकांत पाचकवडे अकोला जिल्हा परिषदेतील कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रा...

Continue reading