धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अडीच महिन्यांतच महायुतीच्या एका नेत्याला राजीनामा द्यावा लागला.
Related News
‘मुलीचा बाबा’ होण्याचा अनुभव खास: Nick Jonasचा खुलासा, मालतीसाठी जपतो तिचं कुतूहल
हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी Nick Jonas आणि प्रियंका चोप...
Continue reading
Pink Salt or White Salt?– नेमकं आरोग्यासाठी काय चांगलं? तज्ज्ञांनी सांगितलेलं खरं सत्य
आपल्या रोजच्या आहारातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ (Sal...
Continue reading
Asha Bhosle यांची एक इच्छा अपूर्णच राहिली; रितेश देशमुखने सांगितले भावनिक किस्से
भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आणि ‘स्वरसाम्राज्ञी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
१७ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या : बारावीमध्ये ४४ टक्के गुण मिळाल्याने नैराश्य, उमरखेड हादरले
उमरखेड | २ मे : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर
Continue reading
महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा मोठा उद्रेक: नवापूरमध्ये 1 लाख 40 हजार कोंबड्यांचे कलिंग, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात पुन्हा एकदा
Continue reading
Bellamkonda Sai Sreenivas चा विवाहसोहळा: पत्नी काव्याला दिलं खास स्वागत, शेअर केली रोमँटिक पोस्ट
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते,
मंत्री धनंजय मुंडे यांना काल राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे.
तो धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय असल्यानेच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे. एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार
झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता.
त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच वेळी छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती.
मात्र आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याने त्यांच्या जागी भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं.
याच मुद्यावरून अंजली दमानियांनी रोखठोक भूमिका मांडली.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे. ज्यांनी महाराष्ट्र सदनचा घोटाळा केला त्यांना मंत्रीपद कसं देऊ शकतात
असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, जर छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं तर कोर्टात
जाऊन त्यांची बेल रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही दमानियांनी सांगितलं.
त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रीपद मिळण्याच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यताही आहे.
गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे
जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पीडित महिलेसोबत आपण स्वतः राज्यपालांकडे जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
विकृत व्यक्तींना मंत्रीमंडळात स्थान देऊ नका असी भूमिकाही दमानियांनी घेतली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात अंजली दमानिया अतिशय आक्रमर झाल्याचं पहायला मिळत आहे.
असा मंत्री जर मंत्रिमंडळात बसत असेल तर त्याला तिथून दूर करणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि अशा लोकांना
मंत्रिपदाची देण्याची काय गरज? चांगली लोकं सरकारला मिळत नाहीत का?
म्हणजे चांगली लोकं महाराष्ट्रात नाहीत का? का असे शोधून शोधून एक एक नग त्या मंत्रिमंडळात भरलेत मला तोच प्रश्न पडतोय असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.
Read more here:
https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/