धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अडीच महिन्यांतच महायुतीच्या एका नेत्याला राजीनामा द्यावा लागला.
Related News
दारूच्या वादात काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहेय.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलोनी भागात एका
बंद घरात 30 वर्षीय युवक कुणा...
Continue reading
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
Continue reading
अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .
१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
...
Continue reading
अकोट : अकोट शहरातील अंजनगाव रोड, शिवाजी हायस्कूल बाजूला राहणारे गजानन
वासुदेव वानखडे वय 59 वर्ष रोड वरून चालत जेवण करण्यासाठी घरी पाई चालत येत असताना,
मागील बाजूने येणाऱ्या ए...
Continue reading
अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळ...
Continue reading
डी डी ए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी
नोकरी मिळण्याची संधी 1383 पदांवर सर्वात मोठी भरती
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटी मध्ये ज्युनियर इंजिनियर सहित इतर पद...
Continue reading
अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन करून
ऑफ्रोह संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निर्देशने केली.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या २८ एप्रिल 2025 त्या ...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील
सातपुड्यातुन येणाऱ्या घोगा नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्यासाठी कंत्राटदाराने
मोठी नाली खोदकाम सुरू केले ...
Continue reading
अकोट : शहराल अकोला नाका ब्रिजवर पथदिवे लावणे संदर्भात 6 नोव्हेंबर 2023 रोजी
वंचित बहुजन आघाडीचे विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
सायंकाळच्या वेळेस...
Continue reading
अकोला जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच जिल्ह्यातील
नगरपालिका नगरपंचायत व महानगर निवडणूक संदर्भात अकोला जिल्हा
वंचित बहुजन आघाडी समन्वयक म्हणून माजी आमदार एड ...
Continue reading
मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृष्य अवकाळी पावसाने
अकोला जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, या पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६
हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराच...
Continue reading
राज्याच्या पोलिस विभागात अलीकडेच करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेत
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे
आदेश नुकतेच जारी करण्यात आले.
यामध्ये वाहतूक शाखा प्रमुख सुनी...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते,
मंत्री धनंजय मुंडे यांना काल राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे.
तो धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय असल्यानेच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे. एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार
झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता.
त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच वेळी छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती.
मात्र आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याने त्यांच्या जागी भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं.
याच मुद्यावरून अंजली दमानियांनी रोखठोक भूमिका मांडली.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे. ज्यांनी महाराष्ट्र सदनचा घोटाळा केला त्यांना मंत्रीपद कसं देऊ शकतात
असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, जर छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं तर कोर्टात
जाऊन त्यांची बेल रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही दमानियांनी सांगितलं.
त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रीपद मिळण्याच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यताही आहे.
गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे
जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पीडित महिलेसोबत आपण स्वतः राज्यपालांकडे जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
विकृत व्यक्तींना मंत्रीमंडळात स्थान देऊ नका असी भूमिकाही दमानियांनी घेतली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात अंजली दमानिया अतिशय आक्रमर झाल्याचं पहायला मिळत आहे.
असा मंत्री जर मंत्रिमंडळात बसत असेल तर त्याला तिथून दूर करणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि अशा लोकांना
मंत्रिपदाची देण्याची काय गरज? चांगली लोकं सरकारला मिळत नाहीत का?
म्हणजे चांगली लोकं महाराष्ट्रात नाहीत का? का असे शोधून शोधून एक एक नग त्या मंत्रिमंडळात भरलेत मला तोच प्रश्न पडतोय असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.
Read more here:
https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/