भारताचा सामना सुरु होण्यापूर्वी आता पाकिस्तानच्या संघावर
आयसीसीने कडक कारवाई केली आहे.
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे.
पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आता आयसीसीने पाकिस्तानवर कडक कारवाई केल्याचे आता समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांचे चॅम्पियन्य ट्रॉफीमध्ये प्रत्येकी एक सामना झाला आहे.
Related News
जय श्रीराम जय गोमाता .🚩🚩
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षक...
Continue reading
देऊन तिरोडा-आकोट या चालत्या एसटी बसमधून वाहकाने खाली उतरून दिले
अकोट
अशी गंभीर घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली तिरोडा आगाराची बस अकोटला साडेसात आठ वाजेच्या दरम्यान पोहोचते व ...
Continue reading
अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील इंटरनॅशनल
स्कूल ऑफ एंटीग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये
आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची
दिंडी काढण्यात आली.
यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याने
...
Continue reading
अकोला – अकोला शहरातील ३२० वर्षे जुने श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मंगलमय वातावरणात महापूजा संपन्न झाली. मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्वस...
Continue reading
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष
गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने
...
Continue reading
पातूर : तालुक्यातील ग्रामपंचायत बोडखा (चिंचखेड) मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करून
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.राज बोरकर यांनी केला आह...
Continue reading
अकोला शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी अकोल्यात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
विश...
Continue reading
अकोट शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
केवळ “मुलाकडे आई अधिक लक्ष देते” या कारणावरून एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्दय खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समो...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे.
पण भारताने पहिल्या सामन्यात विजय साकारला. भारताने पहिल्या
सामन्यात बांगलादेशवर मात करत आपले गुणांचे खाते उघडले आहे.
त्यामुळे पाकिस्तानसाठी आता करो या मरो, असाच सामना भारताविरुद्ध खेळावा लागणार आहे.
कारण भारताविरुद्धच्या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.
भारत आणि पाकिस्तान
यांच्यातील सामना हा रविवारी खेळवण्यात येणार आहे.
पण आता शुक्रवारीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
कारण आयसीसीने आता पाकिस्तानच्या संघावर कडक कारवाई केली आहे.
पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला. त्यावेळी पाकिस्तानचा पराभव तर झालाच
, पण त्यानंतर आता अजून एक मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे.
कारण या सामन्यात पाकिस्तानने संथ गतीने गोलंदाजी केली होती आणि त्याचा फटका आता त्यांना बसला आहे.
कारण आयसीसीने कडक कारवाई करताना पाकिस्तानच्या संघातील
सर्व खेळाडूंना मानधनाच्या पाच टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात येणार आहे.
त्याचबरोबर
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानला ताकिद
देण्यात आली आहे.
त्यामुळे आता भारताविरुद्धच्या सामन्यात जर पुन्हा एकदा पाकिस्तानं संथ गतीने गोलंदाजी केली,
तर आयसीसीच्या त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे आता समोर आले आहे.
त्यामुळे भारताविरुद्धच्या सर्वात दडपणाखालील सामन्यात आता पाकिस्तानला षटकांच्या गतीचे जास्त दडपण असणार आहे.
त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार आता या सामन्यात गोलंदाजांचा वापर कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे. पण यावेळी पाकिस्तानवर सर्वात जास्त दडपण असणार आहे
. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पहिला सामना गमावला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला आता षटकांची गती योग्य ठेवावी लागणार आहे.
रविवारच्या सामन्यासाठी भारताचे पारडे हे पाकिस्तानपेक्षा नक्की जड असल्याचे समोर आले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/amhi-goat-kapanare-bajar-lady-amardarala-jeeve-maranyachi-threatened-hindi-marathi-patra-namam-kya-lihalanya/