अकोला शहरात वसलेले एक अनोखे आणि पवित्र स्थळ – अंजनी माता आणि हनुमान यांचे
एकत्रित स्वयंभू मंदिर. देशात इतरत्र कुठेही न आढळणारे हे मंदिर,
अकोल्यातील मोहता मिल परिसरात स्थित असून “तपे हनुमान” या नावाने प्रसिद्ध आहे.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साडेचारशे ते पाचशे वर्षांची प्राचीनता. प्रत्येक वर्षी येथे ह
नुमान जन्मोत्सव, रामनवमी, तसेच इतर अनेक धार्मिक सण मोठ्या श्रद्धेने
आणि उत्साहात साजरे केले जातात. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात गर्दी करतात.
“हे मंदिर खूपच पवित्र आहे. संकटात असताना आम्ही येथे येतो आणि प्रार्थना करतो.
अंजनी मातेची आणि हनुमानाची कृपा नक्कीच मिळते.”
अंजनी माता, हनुमानाची माता, ही शक्तीचे प्रतीक मानली जाते. तिची पूजा केल्याने भक्तांना धैर्य,
आत्मविश्वास आणि संकटातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात स्तोत्र,
मंत्र पठण, पूजा-अर्चा या माध्यमातून भक्त आपली भावना व्यक्त करतात.
या मंदिराचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांनाही खुला प्रवेश आहे.
म्हणूनच देशभरातून येथे भक्तगण दर्शनासाठी येतात. हे मंदिर आज अकोल्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र
म्हणून ओळखले जात असून सरकारदरबारी याला अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
“हे मंदिर फक्त श्रद्धेचे नाही, तर सामर्थ्य आणि भक्तीचे प्रतीक आहे. याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास अधिक भाविकांना सुविधा मिळतील.”
तपे हनुमान मंदिर, केवळ अकोल्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आध्यात्मिक वैभव असून,
येथील भक्तीमय वातावरण श्रद्धाळूंना मन:शांती आणि आंतरिक बल देणारे ठरते.